शहरं
Join us  
Trending Stories
1
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
2
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
3
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
4
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
6
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
7
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
8
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
9
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
10
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
11
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
12
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
13
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
14
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
15
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
16
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
17
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
18
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
19
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
20
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: देश दुसऱ्या लॉकडाऊनच्या दिशेने? कोणत्या राज्यात काय आहेत निर्बंध? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 04:40 IST

CoronaVirus restrictions: देशातील सर्वाधिक रुग्णवाढीत नाशिक, नागपूर, पुणे, मुंबईचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : महाराष्ट्रात १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. १ मेपर्यंत राज्यात संचारबंदी असणार आहे. अनिवार्य सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. दिल्लीत शुक्रवारी रात्रीपासून ५६ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी सकाळपर्यंत हे निर्बंध असणार आहेत. आपत्कालीन सेवा वगळता सर्व सेवा या काळात बंद राहणार आहेत. राजस्थानात शुक्रवारी सहा वाजेपासून सोमवारी सकाळी पाचपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. अनिवार्य सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत.चंदीगडमध्ये वीकेंड लॉकडाऊन लागू केले आहे. शुक्रवारी रात्री १० पासून सोमवारी सकाळी पाचपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. अनिवार्य सेवांना यातून सूट आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, मॉल हे ५० टक्के लोकांसह चालू राहतील. उत्तर प्रदेश सरकारने रविवारी लॉकडाऊन जाहीर केले आहे. मास्क न वापरणाऱ्यांना १००० रुपये दंड आकारला जाणार आहे. फक्त आवश्यक सेवा सुरू असतील. 

n    देशातील चार शहरांत नव्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. दर दहा लाख लोकांमागे नवे रुग्ण वाढत असलेल्या शहरांत नागपूर, पुणे, मुंबई व नाशिक या शहरांचा समावेश आहे. n    गत एक महिन्यातील आकडेवारीवरून हे दिसून आले आहे. तर, टॉप टेनमध्ये दिल्ली, लखनौ, बंगळुरू, भोपाळ, इंदूर, पाटणा यांचा समावेश आहे. १६ मार्च ते १५ एप्रिल या काळात मुंबईत ३.७ लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

मुंबईत गेल्या महिन्यात ३.७० लाख रुग्णn    देशातील ज्या शहरात गत महिन्यात रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात झाली त्यात नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई, लखनौ, दिल्ली यांचा समावेश आहे. n    नाशिकमध्ये गत महिन्यात ९७,७६५, नागपूरमध्ये १,३४,८४०, पुण्यात २,४७,५२९, मुंबई ३,७०,८९६, लखनौ ४५,१२८, दिल्ली १,४०,०७३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.  असे आहेत निर्बंधn    कर्नाटकात राज्य सरकारने सात जिल्ह्यांतील रात्रीची संचारबंदी २० एप्रिलपर्यंत लागू केली. बंगळुरु, मंगळुरु, कालाबुरागी, बीदर, तुमकुरु, उडुपी- मणिपाल येथे हे निर्बंधा लागू असतील.n    पंजाब सरकारने राज्यात ३० एप्रिलपर्यंत रात्री ९ ते सकाळी ५ या काळात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. शाळा बंद करण्यात आल्या आहेत.n    उत्तराखंडमध्ये रात्री १०.३० ते सकाळी ५ पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. बसपासून ते सार्वजनिक वाहनात बसण्याची क्षमता ५० टक्के घटविली आहे. हरयाणात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.n    ओडिशाच्या दहा जिल्ह्यांत वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. हे सर्व जिल्हे छत्तीसगडच्या बॉर्डरवरील आहेत. तर सर्व शहरी भागात १७ एप्रिलपासून रात्रीची संचारबंदी असेल. केरळमध्येही कोणत्याही समारंभासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. n    छत्तीसगडच्या अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तर जम्मू - काश्मिरातील जम्मू, उधमपूर, कठुआ, श्रीनगर, बारामुला, बडगाम, अनंतनाग, कुपवाडासह आठ जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी असणाार आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या