शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

CoronaVirus: देश दुसऱ्या लॉकडाऊनच्या दिशेने? कोणत्या राज्यात काय आहेत निर्बंध? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 04:40 IST

CoronaVirus restrictions: देशातील सर्वाधिक रुग्णवाढीत नाशिक, नागपूर, पुणे, मुंबईचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : महाराष्ट्रात १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. १ मेपर्यंत राज्यात संचारबंदी असणार आहे. अनिवार्य सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. दिल्लीत शुक्रवारी रात्रीपासून ५६ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी सकाळपर्यंत हे निर्बंध असणार आहेत. आपत्कालीन सेवा वगळता सर्व सेवा या काळात बंद राहणार आहेत. राजस्थानात शुक्रवारी सहा वाजेपासून सोमवारी सकाळी पाचपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. अनिवार्य सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत.चंदीगडमध्ये वीकेंड लॉकडाऊन लागू केले आहे. शुक्रवारी रात्री १० पासून सोमवारी सकाळी पाचपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. अनिवार्य सेवांना यातून सूट आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, मॉल हे ५० टक्के लोकांसह चालू राहतील. उत्तर प्रदेश सरकारने रविवारी लॉकडाऊन जाहीर केले आहे. मास्क न वापरणाऱ्यांना १००० रुपये दंड आकारला जाणार आहे. फक्त आवश्यक सेवा सुरू असतील. 

n    देशातील चार शहरांत नव्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. दर दहा लाख लोकांमागे नवे रुग्ण वाढत असलेल्या शहरांत नागपूर, पुणे, मुंबई व नाशिक या शहरांचा समावेश आहे. n    गत एक महिन्यातील आकडेवारीवरून हे दिसून आले आहे. तर, टॉप टेनमध्ये दिल्ली, लखनौ, बंगळुरू, भोपाळ, इंदूर, पाटणा यांचा समावेश आहे. १६ मार्च ते १५ एप्रिल या काळात मुंबईत ३.७ लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

मुंबईत गेल्या महिन्यात ३.७० लाख रुग्णn    देशातील ज्या शहरात गत महिन्यात रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात झाली त्यात नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई, लखनौ, दिल्ली यांचा समावेश आहे. n    नाशिकमध्ये गत महिन्यात ९७,७६५, नागपूरमध्ये १,३४,८४०, पुण्यात २,४७,५२९, मुंबई ३,७०,८९६, लखनौ ४५,१२८, दिल्ली १,४०,०७३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.  असे आहेत निर्बंधn    कर्नाटकात राज्य सरकारने सात जिल्ह्यांतील रात्रीची संचारबंदी २० एप्रिलपर्यंत लागू केली. बंगळुरु, मंगळुरु, कालाबुरागी, बीदर, तुमकुरु, उडुपी- मणिपाल येथे हे निर्बंधा लागू असतील.n    पंजाब सरकारने राज्यात ३० एप्रिलपर्यंत रात्री ९ ते सकाळी ५ या काळात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. शाळा बंद करण्यात आल्या आहेत.n    उत्तराखंडमध्ये रात्री १०.३० ते सकाळी ५ पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. बसपासून ते सार्वजनिक वाहनात बसण्याची क्षमता ५० टक्के घटविली आहे. हरयाणात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.n    ओडिशाच्या दहा जिल्ह्यांत वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. हे सर्व जिल्हे छत्तीसगडच्या बॉर्डरवरील आहेत. तर सर्व शहरी भागात १७ एप्रिलपासून रात्रीची संचारबंदी असेल. केरळमध्येही कोणत्याही समारंभासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. n    छत्तीसगडच्या अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तर जम्मू - काश्मिरातील जम्मू, उधमपूर, कठुआ, श्रीनगर, बारामुला, बडगाम, अनंतनाग, कुपवाडासह आठ जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी असणाार आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या