शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

coronavirus : लॉकडाऊनमुळे जलप्रदूषण घटलेे, गंगेेचे पाणी स्वच्छ झालेे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 10:34 IST

गंगेचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारी आणि इतर स्तरावरून खूप प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्याला म्हणावे तसे यश मिळू शकलेले नाही. मात्र...

वाराणसी - देशातील सर्वात मोठी आणि धार्मिकदृष्ट्या पवित्र नदी मानली गेलेली गंगा नदी गेल्या काही दशकात वाढत्या औद्योगिकिकरणामुळे कमालीची प्रदूषित झाली आहे. गंगेचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारी आणि इतर स्तरावरून खूप प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्याला म्हणावे तसे यश मिळू शकलेले नाही. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या नामामी गंगे योजनेमुळेही फारसा फरक पडलेला नाही.  मात्र जे सरकारला आणि इतर संस्थांना जमले नाही ते कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनने करून दाखवले आहे. लॉकडाऊनमुळे देशातील बहुतांश कंपन्या आणि कारखाने बंद आहेत. त्यामुळे देशातील बहुतांश भागातील हवा शुद्ध झाली आहे. तसेच प्रदूषणकारी कारखान्यांमुळे जलप्रदूषणाचा सामना करत असलेल्या गंगेतील पाण्याच्या गुणवत्तेवरही कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा सुपरिणाम झाला आहे. 24 मार्चला करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर गंगेच्या किनाऱ्यावरील अनेक प्रदूषणकारी कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे गंगेतील प्रदूषणाच्या पातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे गंगेच्या स्वच्छतेत 40 ते 50 टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. 

 याबाबत प्राध्यापक पी. के. मिश्रा यांनी सांगितले की, गंगेत होणाऱ्या एकूण प्रदूषणामध्ये उद्योगांचा वाटा 10 टक्के आहे. मात्र लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद झाल्याने प्रदूषणात मोठी घट झाली आहे. तसेच 15 आणि 16 मार्च रोजी झालेल्या पावसामुळे गंगेतील पाणी पातळी वाढल्याने तिची सफाई क्षमताही वाढली आहे. 24 मार्चपूर्वीच्या स्थितीशी तुलना केली असता गंगेतील पाण्याच्या गुणवत्तेत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे.

टॅग्स :riverनदीcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशpollutionप्रदूषण