शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

कोरोनाची चौथी लाट आल्यास भारतावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केलं धक्कादायक विधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 8:22 PM

Coronavirus Updates in India: चीन आणि दक्षिण कोरियासह युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसून आलं आहे.

Coronavirus Updates in India: चीन आणि दक्षिण कोरियासह युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भारतातही चिंता व्यक्त केली जात आहे. आता दिल्ली एम्सने या मुद्द्यावर मोठं विधान केलं आहे. "SARS-CoV-2 (कोरोनाव्हायरस) हा 'RNA' विषाणू आहे. त्याच्या प्रकारांमध्ये बदल होत राहणार हे नक्की. त्यात एक हजाराहून अधिक बदल झाले आहेत. मात्र, असे केवळ 5 प्रकार समोर आले असून, ते चिंतेचं कारण बनलं आहे", AIIMS दिल्लीचे वरिष्ठ एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. संजय राय म्हणाले. 

"गेल्या वर्षी भारताला कोरोना व्हायरसच्या अत्यंत विनाशकारी दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला, जो खूप दुर्दैवी होता. मात्र, आता कोरोना लसीकरणामुळे लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. यासोबतच भारतीयांमध्ये निर्माण होणारा नैसर्गिक संसर्ग ही एक मोठी शक्ती आहे, जी लोकांना दीर्घ काळासाठी चांगले संरक्षण प्रदान करते. भविष्याबद्दल बोलायचे झाल्यास, कोरोनाच्या कोणत्याही लाटेचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाही", असं डॉ. संजय राय म्हणाले. 

'मास्क वापर शिथिल करण्याचा सरकार विचार करू शकते'"सध्याची वेळ अशी आहे की भारत सरकार मास्क वापरण्याचा नियमात शिथिलता आणण्याचा करण्याचा विचार करू शकते. ज्येष्ठ नागरिक आणि संसर्गाचा संशय असलेल्या लोकांनी खबरदारी म्हणून मास्क घालणे सुरू ठेवावं", असं डॉ. राय म्हणाले. भविष्यात कोरोनाव्हायरसचे कोणतेही नवीन प्रकार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारनं जीनोमिक सिक्वेन्सिंगसह SARS-CoV-2 चं निरीक्षण करणं सुरू ठेवावं, यावरही राय यांनी भर दिला. 

'कोरोना भारतात जास्त संसर्गजन्य होणार नाही'आणखी एक एपिडेमियोलॉजिस्ट डॉ चंद्रकांत लहरिया यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचे नवीन प्रकार भारतात समोर आले असले तरी, भारतात संक्रमितांची संख्या वाढण्याची शक्यता फार कमी आहे. "जर आपण सीरो सर्वेक्षण, लसीकरण कव्हरेज आणि व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटचा प्रसार यांचा डेटा पाहिला, तर असा निष्कर्ष काढता येईल की भारतात कोरोना महामारी संपली आहे. अशा परिस्थितीत पुढील काही महिन्यांपर्यंत भारतात कोरोनाची नवी लाट आणि नवीन रूपे समोर येण्याची शक्यता फारच कमी आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा बहुतेक लोकसंख्येला मास्क घालण्याच्या अनिवार्यतेपासून सूट दिली जाऊ शकते", असं डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणाले. 

'लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती विकसित झाली आहे'सफदरजंग हॉस्पिटलमधील कम्युनिटी मेडिसिनचे प्रमुख डॉ जुगल किशोर यांनीही हेच मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, ''सीरो सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की 80-90 टक्के लोकसंख्येला संसर्ग झाला आहे. म्हणजेच आता भारतीयांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. अशा परिस्थितीत सरकार आता लोकांना मास्क घालण्यासारख्या उपायांमधून सूट देऊ शकते"

लसीकरणावरील नॅशनल कन्सल्टन्सी ग्रुपच्या कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी देशात लसीकरणाची व्याप्ती जास्त आहे. अशा परिस्थितीत भारतात कोणत्याही नव्या लाटेचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे, असं मत व्यक्त केलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक