शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

coronavirus: कोरोना चाचण्यांबाबत विविध राज्ये करताहेत या तीन चुका, होऊ शकतो गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 22:49 IST

जानेवारीच्या अखेरीस देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत देशात कोरोनाच्या पन्नास लाखांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत. जागतिक पातळीवर ही चौथ्या क्रमांकाची संख्या आहे.  मात्र लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचा विचार केल्यास भारत  खूप मागे आहे.

ठळक मुद्देभारतात काही राज्ये खूप कमी लोकांची कोरोना चाचणी घेत आहेत काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या तुलनेत कमी चाचण्या केल्या जात आहेतकोरोनाच्या चाचण्यांबाबत होत असलेली तिसरी चूक म्हणजे काही राज्यांकडून कोरोनाच्या चाचण्यांमध्ये होत नसलेली वाढ

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. दरम्यान, जानेवारीच्या अखेरीस देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत देशात कोरोनाच्या पन्नास लाखांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत. जागतिक पातळीवर ही चौथ्या क्रमांकाची संख्या आहे.  मात्र लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचा विचार केल्यास भारत  खूप मागे आहे. १९ मे रोजी देशातील दरदिवशीच्या कोरोना चाचण्यांचा आकडा एक लाखांच्या पुढे पोहोचला होता. मात्र भारतात कोरोनाच्या चाचण्या घेण्याबाबत तीन गंभीर चुका होत आहेत. या चुका राज्यांकडून होत आहेत.

पहिली चूक - कमी होणाऱ्या चाचण्याभारतात काही राज्ये खूप कमी लोकांची कोरोना चाचणी घेत आहेत. याबाबतीत गुजरातचे उदाहरण देता येईल. कोरोनाच्या रुग्णसंख्येत चौथ्या स्थानी असूनही चाचण्यांच्या बाबतीत हे राज्य खालून पाचव्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये दर दहा लाख लोकांमागे केवळ ८४ चाचण्या होत आहेत. अशा प्रकारांमुळे कोरोनाचे नवे रुग्ण शोधून काढण्याच्या प्रयत्नांना धक्का बसत आहे. 

दुसरी चूक - रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत कमी चाचण्या काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या तुलनेत कमी चाचण्या केल्या जात आहेत. कोरोनाच्या टेस्टिंगमध्ये टेस्ट पॉझिटिव्हिटी आणि दररोज प्रति दहा लाख लोकसंख्येमागे केलेल्या चाचण्या महत्त्वाच्या मानल्या जातात. जास्त टीपीआर आणि कमी टेस्टिंगमुळे महाराष्ट्र व गुजरात अधिक अडचणीत आहेत. तर गोवा आणि जम्मू काश्मीर ही राज्ये दर दहा लाख लोकसंख्येमागे सर्वाधिक चाचण्या करत आहेत. 

तिसरी चूक  - काही राज्यांकडून कोरोनाच्या चाचण्यांमध्ये होत नसलेली वाढ कोरोनाच्या चाचण्यांबाबत होत असलेली तिसरी चूक म्हणजे काही राज्यांकडून कोरोनाच्या चाचण्यांमध्ये होत नसलेली वाढ होय. मे महिन्याच्या मध्यावर काही राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली. दिल्ली, गुजरातसारखी राज्ये वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत टेस्ट वाढवत नाही आहेत. तर महाराष्ट्र आणि तामिळनाडूसारख्या राज्यांनी टेस्टिंग वाढवले आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूत रोज    सरासरी १४ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. तर गुजरात आणि दिल्लीत सरासरी सहा हजार चाचण्या होत आहेत. त्यातही गुजरात हे दिल्लीपेक्षा मोठे राज्य असूनही तिथे जेमतेम दिल्लीएवढ्याच चाचण्या झाल्या आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

काश्मीर खोऱ्यातील हिंदूना शस्रे पुरवा, माजी पोलीस महासंचालकांचा सल्ला

त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

जबरदस्त! LOCवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराचा दणका, १० चौक्या केल्या उद्ध्वस्त

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरातdelhiदिल्लीTamilnaduतामिळनाडू