शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: बिहारमध्ये PM केअर्समधील २५ व्हेंटिलेटर ९ महिनांपासून धूळखात; एकदाही वापर नाही!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 11:01 IST

CoronaVirus: बिहारमधील दरभंगा येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर PM केअर्स फंडातून आयसीयू सेटअपसह २५ व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले होते.

ठळक मुद्देबिहारमध्ये PM केअर्समधील २५ व्हेंटिलेटर ९ महिनांपासून धूळखातदरभंगा येथील बाब उघडकीसव्हेंटिलेटर्स न वापरण्याचे कारण काय?

दरभंगा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशात अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचित कमी होताना दिसत असली, तरी कोरोनामुळे वाढती मृत्यूंची संख्या चिंताजनक ठरत चालली आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. केंद्राकडून राज्यांना शक्य ती मदत केली जात असतानाही बिहारमधील दरभंगा येथून धक्कादायक माहिती समोर येत आहे. PM केअर्समधून देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स धूळखात पडले असून, गेल्या ९ महिन्यांत त्याचा एकदाही वापर केला गेला नसल्याचे सांगितले जात आहे. (coronavirus pm cares ventilators not used for last 9 months in darbhanga bihar)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन यांच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना देशभरात घडल्या आहेत. मात्र, बिहारमधील दरभंगा येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर PM केअर्स फंडातून आयसीयू सेटअपसह २५ व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले होते. मात्र, हे सर्व व्हेंटिलेटर्स धूळखात पडले असून, गेल्या ९ महिन्यांपासून एकदाही वापरले नसल्याची माहिती मिळाली आहे. 

बिहारमध्ये कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू, पण ७८९ जणांवर अंत्यसंस्कार!; हायकोर्टही हैराण 

व्हेंटिलेटर्स न वापरण्याचे कारण काय?

PM केअर्समधून व्हेंटिलेटर्स आले असतानाही त्याचा वापर का गेला नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावर डीएमसीएचचे अधीक्षक डॉ. मणि भूषण यांनी प्रतिक्रिया दिली. आयसीयू सेटअपसह व्हेंटिलेटर्स मिळाले, ही बाब सत्य आहे. या व्हेंटिलेटर्सना वापरासाठी तयार करण्यात येत होते. मात्र, ड्राय-रन प्रक्रिया यशस्वीरित्या सुरू होत नसल्यामुळे हे व्हेंटिलेटर्स वापरले नाहीत, असे भूषण म्हणाले. तसेच या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आले आहेत. ड्राय-रन प्रक्रियेची चाचणी पुन्हा करण्यात येत असून, लवकरच हे व्हेंटिलेटर्स सुरू होऊन वापरात येतील, असे विश्वास भूषण यांनी व्यक्त केला आहे. 

चिंतेत भर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांनी गमावला जीव; बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू

रुग्णांसाठी धोकादायक ठरले असते

ड्राय-रन प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे असते. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू झाली नाही, तर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी ड्राय-रन प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू झाल्याशिवाय व्हेंटिलेटर्स न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही भूषण यांनी सांगितले. 

राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६७ हजार ३३४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, ३ लाख ८९ हजार ८५१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तसेच गेल्या २४ तासांत ४ हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १८ कोटी ५८ लाख ०९ हजार ३०२ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारState Governmentराज्य सरकार