शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

CoronaVirus: बिहारमध्ये PM केअर्समधील २५ व्हेंटिलेटर ९ महिनांपासून धूळखात; एकदाही वापर नाही!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 11:01 IST

CoronaVirus: बिहारमधील दरभंगा येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर PM केअर्स फंडातून आयसीयू सेटअपसह २५ व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले होते.

ठळक मुद्देबिहारमध्ये PM केअर्समधील २५ व्हेंटिलेटर ९ महिनांपासून धूळखातदरभंगा येथील बाब उघडकीसव्हेंटिलेटर्स न वापरण्याचे कारण काय?

दरभंगा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशात अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचित कमी होताना दिसत असली, तरी कोरोनामुळे वाढती मृत्यूंची संख्या चिंताजनक ठरत चालली आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. केंद्राकडून राज्यांना शक्य ती मदत केली जात असतानाही बिहारमधील दरभंगा येथून धक्कादायक माहिती समोर येत आहे. PM केअर्समधून देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स धूळखात पडले असून, गेल्या ९ महिन्यांत त्याचा एकदाही वापर केला गेला नसल्याचे सांगितले जात आहे. (coronavirus pm cares ventilators not used for last 9 months in darbhanga bihar)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन यांच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना देशभरात घडल्या आहेत. मात्र, बिहारमधील दरभंगा येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर PM केअर्स फंडातून आयसीयू सेटअपसह २५ व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले होते. मात्र, हे सर्व व्हेंटिलेटर्स धूळखात पडले असून, गेल्या ९ महिन्यांपासून एकदाही वापरले नसल्याची माहिती मिळाली आहे. 

बिहारमध्ये कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू, पण ७८९ जणांवर अंत्यसंस्कार!; हायकोर्टही हैराण 

व्हेंटिलेटर्स न वापरण्याचे कारण काय?

PM केअर्समधून व्हेंटिलेटर्स आले असतानाही त्याचा वापर का गेला नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावर डीएमसीएचचे अधीक्षक डॉ. मणि भूषण यांनी प्रतिक्रिया दिली. आयसीयू सेटअपसह व्हेंटिलेटर्स मिळाले, ही बाब सत्य आहे. या व्हेंटिलेटर्सना वापरासाठी तयार करण्यात येत होते. मात्र, ड्राय-रन प्रक्रिया यशस्वीरित्या सुरू होत नसल्यामुळे हे व्हेंटिलेटर्स वापरले नाहीत, असे भूषण म्हणाले. तसेच या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आले आहेत. ड्राय-रन प्रक्रियेची चाचणी पुन्हा करण्यात येत असून, लवकरच हे व्हेंटिलेटर्स सुरू होऊन वापरात येतील, असे विश्वास भूषण यांनी व्यक्त केला आहे. 

चिंतेत भर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांनी गमावला जीव; बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू

रुग्णांसाठी धोकादायक ठरले असते

ड्राय-रन प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे असते. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू झाली नाही, तर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी ड्राय-रन प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू झाल्याशिवाय व्हेंटिलेटर्स न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही भूषण यांनी सांगितले. 

राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६७ हजार ३३४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, ३ लाख ८९ हजार ८५१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तसेच गेल्या २४ तासांत ४ हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १८ कोटी ५८ लाख ०९ हजार ३०२ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारState Governmentराज्य सरकार