शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

coronavirus: चीनमधील एक हजार गुंतवणूकदारांचे भारताकडे लक्ष -हरदीपसिंग पुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 05:24 IST

नागरी उड्डयन आणि गृहनिर्माण (स्वतंत्र प्रभार) आणि वाणिज्य राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी नवी दिल्लीत घेतलेली मुलाखत.

 नागरी उड्डयन आणि गृहनिर्माण (स्वतंत्र प्रभार) आणि वाणिज्य राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी नवी दिल्लीत घेतलेली मुलाखत.चीनमधून स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांची खूप चर्चा आहे. काही प्रगती?आम्ही विविध मंत्रालयांसोबत १,००० संभाव्य गुंतवणूकदारांची यादी शेअर केली आहे. जेणेकरून, गुंतवणुकीला गती येईल. फॉक्सकॉन अँड विस्ट्रॉन (अ‍ॅपलसाठी काम करणारी कंपनी), कार्बन, लावा यांनी प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज केला आहे. यासाठी आम्ही एका संस्थात्मक आराखड्याच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. जपान सरकार चीनमधील त्यांच्या कंपन्यांना स्थलांतरित करण्यासाठी निधी देणार आहे.२०२०- २१ या काळात किती कंपन्या येतील?ही तर एक सुरुवात आहे. मात्र, कोरोनाच्या काळात जागतिक स्तरावर आदान-प्रदानाची साखळी खंडित झाली आहे. जपान, कोरिया आणि अमेरिकेच्या कंपन्यांकडून आम्हाला अपेक्षा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्यावर एवढा विश्वास दाखविण्याचे रहस्य काय?पंतप्रधान मोदी यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि माझ्याकडे दिलेल्या जबाबदाºया याबद्दल मी त्यांचा खूप कृतज्ञ आहे. ते जे काम देतील ते मी उत्तमरीत्या करीन.तुम्ही पहिल्यांदाच खासदार झाला असून, माजी मुत्सद्दी आहात.भारतीय परराष्ट्र सेवेत आणि मुत्सद्दी म्हणून मी ४० वर्षे काम केले. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश व्हायच्या आधी मी ‘थिंक टँक’चा अध्यक्ष होतो.उड्डयन मंत्रालय सर्व मंत्रालयांत कठीण आहे?ते फारच कठीण आहे, असे मी म्हणणार नाही; परंतु फक्त भारतातच अर्थव्यवस्थेच्या आव्हानात्मक क्षेत्रांपैकी एक आणि महत्त्वाचे हे क्षेत्र आहे, असे नाही तर जगातही महत्त्व आहे.आज तुम्ही सगळ्यात मोठ्या कोणत्या आव्हानाला तोंड देत आहात?उड्डयन उद्योगाला कोविड-१९ चा फार मोठा फटका बसला. जगात अनेक विमान कंपन्या दिवाळखोरीत गेल्या. लॉकडाऊननंतर लगेचच लाईफ लाईन उडान मोहिमेत एअर इंडियाने विदेशातून १९०० टन वैद्यकीय साहित्य आणले आणि मित्रदेशांना ३० टन पाठवले. वंदे भारत उड्डाणांद्वारे साडेचार लाखांपेक्षा जास्त लोकांना हलविण्यात आले. आमच्यासमोर आव्हान आहे ते आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचे.आंतरराष्ट्रीय उड्डाणे नियमित कधी सुरू होणार?आमची देशातील हवाई वाहतूक तिच्या क्षमतेच्या ५०-६० टक्क्यांपर्यंत पोहोचली की आणि इतर देश कोणत्याही अटी किंवा बंधनाशिवाय आंतरराष्ट्रीय वाहतूक कशी खुली करतात, त्यानुसार नियमितपणे आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होतील. परंतु राज्यांना तर देशांतर्गत उड्डाणेही वाढविण्याची भीती आहे.२६ जूनपासून ४५ टक्के क्षमतेपर्यंत ते गेले आहे. पहिल्या दिवशी ३० हजार प्रवाशांसह सुरुवात केली आणि ६५ हजारांना स्पर्श केला. उड्डाणांची संख्या दिवसाला ४३० वरून ७५० झाली.अनेक राज्यांनी स्पष्टपणे नकार दिला असताना तुम्ही हे यश कसे मिळवले?आम्ही त्यांच्याशी बोललो. ते त्यांच्या काही तोडग्यासह (क्वारंटाईन ते चाचण्या इत्यादी) आले होते.महाराष्ट्राने उड्डाणांना नकार दिला होता?(हसले). उद्धव ठाकरेजी हे माझे प्रिय मित्र आहेत. महाराष्ट्र सरकारने मुंबईसाठी फक्त २५ उड्डाणांना परवानगी दिली. रोजची ५० विमाने येणार व जाणार.एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया रुळावर आहे काय?कोरोना साथीमुळे विलंब होत आहे; पण प्रक्रिया रुळावरून उतरलेली नाही.बस सुरू झाल्या आहेत. मात्र, दिल्ली व इतरत्र मेट्रो नाही?मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय गृहमंत्रालयाकडून आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार घेतला जाईल.ई-कॉमर्स कंपन्यांनी उत्पादनांवर मूळ देशाचे नाव द्यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत?यात चूक काय आहे? आम्ही ई-कॉमर्स कंपन्यांना याबाबत सांगितले आहे की, उत्पादनांवर मूळ देशाचे नाव असावे. भारत योग्य मार्गावरून जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत