शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

CoronaVirus News : खळबळजनक! कुटुंबीयांनी दफन केला पॉलिथीनमध्ये गुंडाळलेला मृतदेह अन् 18 दिवसांनी घरी परतली महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 12:49 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह दफन करण्यात आला. मात्र त्यानंतर काही दिवसांनी ती महिला परत आल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,85,74,350 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,32,364 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2713 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,40,702 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक भयंकर घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह दफन करण्यात आला. मात्र त्यानंतर काही दिवसांनी ती महिला परत आल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथील रुग्णालयात एका 70 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 15 मे रोजी तिच्या पतीने पॉलिथीनमध्ये असलेला पत्नीचा मृतदेह दफन केला. त्यानंतर 1 जून रोजी कुटुंबाने शोकसभा आयोजित केली होती. पण दुसऱ्याच दिवशी ही महिला घरी परतल्याने कुटुंबीयांना धक्काच बसला. आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील ख्रिश्चनपेठ गावात ही घटना घडली आहे. गिरिजाम्मा असं या महिलेचं नाव असून यांना कोरोनाची लागण झाली होती. 12 मे रोजी विजयावाडाच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

महिलेचे पती नियमितपणे पत्नीला पाहण्यासाठी रुग्णालयात जात होते. 15 मे रोजी त्यांना त्यांची पत्नी कोविड वॉर्डमध्ये नसल्याचे लक्षात आलं. त्यांनी इतर वॉर्डमध्येही तपास केला मात्र गिरिजाम्मा यांचा पत्ता लागला नाही. त्यावेळी तिथल्या नर्सनी गिरिजाम्मा यांचा मृत्यू झाला असावा असे त्यांना सांगितले. त्यानंतर रुग्णालयाने त्यांना शवगृहातून पॉलिथीनमध्ये गुंडाळलेला एक मृतदेह दिला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर त्यांच्या पतीने तो मृतदेह गावी आणला. कोरोनाच्या भीतीने रुग्णालयातून पॉलिथीनमध्ये गुंडाळून दिलेला मृतदेह कुटुंबीयांनी उघडून पाहिला नाही आणि तो दफन केला.

1 जून रोजी कुटुंबाने एका शोकसभेचे आयोजन केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गिरिजम्मा घरी परतल्या. त्यांना पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यानंतर दुसऱ्याच कोणत्या तरी मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचं सर्वांच्या लक्षात आलं. या सर्व प्रकरणाची माहिती नसलेल्या गिरिजम्मा कोरोनातून बरे झाल्यानंतरही कोणी आपल्याला घ्यायला आलं नाही यामुळे दु:खी होत्या. रुग्णालयाने त्यांना घरी जाण्यासाठी 3000 रुपये दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूAndhra Pradeshआंध्र प्रदेश