शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: आता राज्यांनी स्वत:च जबाबदारीने वागावे, मोदी सरकारचा नवा पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 06:48 IST

लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवून संसर्गाविषयीचे गांभीर्य संपुष्टात आले नसल्याचेच केंद्राने सूचित केले आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रव्यापी लॉकडाऊनचा कालावधी १७ मेपर्यंत वाढवला असला, तरी राज्यांनी आपापल्या क्षेत्रातील परिस्थितीचे गांभिर्य ओळखून व सद््सद््विवेकबुद्धीला स्मरून स्वत: निर्णय घेण्याचा सल्ला केंद्र सरकार देण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांशी गेल्या आठवड्यात झालेल्या चर्चेत बहुतेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तीन मेनंतरही लॉकडाऊन चालू ठेवण्याची शिफारस केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तीन मेनंतर एकूणच निर्बंध काढून टाकण्याची शक्यता नाकारली आहे. उलट लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवून संसर्गाविषयीचे गांभीर्य संपुष्टात आले नसल्याचेच केंद्राने सूचित केले आहे. यापुढे परिस्थितीनुसार राज्यांनीच स्वत:वर काही निर्बंध घालून घ्यावेत, असा केंद्राचा आग्रह रहाणार आहे. आपला या संदर्भातील दृष्टिकोन मांडताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते की, जी राज्ये अजूनही लाल विभागात असतील, त्यांना नारिंगी विभागात आणि तद््नंतर हिरव्या विभागात येण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करावे लागतील.३० एप्रिल रोजी आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांबरोबर घेतलेल्या बैठकीत देशातील १३० लाल विभाग, २८४ नारिंगी व २१९ हरित विभाग निश्चित केले असून वेगाने बदलत जाणारी अशी ही यादी असल्याचे मत त्यांनी मांडले. जी राज्ये लाल विभागात आहेत त्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू व दिल्लीचा समावेश आहे. नारिंगी यादीत उत्तर प्रदेशचाच क्रमांक अग्रभागी असून त्यानंतर तमिळनाडू, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, तेलंगणा, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, जम्मू व काश्मीर आहेत.उत्तर प्रदेश अग्रस्थानीया आठवड्यात आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या यादीत उत्तर प्रदेशातील १९ जिल्हे लाल विभागात आहेत. या राज्याने यापूर्वीच ३० जूनपर्यंत सार्वजनिक मेळाव्यांवर बंदी लागू केली. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी त्या तारखेनंतरही परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, या राज्याने दिल्लीबरोबरची आपली सीमा बंद केली असून नोयडा व गाझियाबाद जिल्ह्यात येणाऱ्या लोकांवर व वाहनांवरही निर्बंध लागू केले आहेत. या राज्यातील जे जिल्हे हरित विभागात मोडतात, त्यांच्यावरचे काही निर्बंध सैल करण्यासंदर्भात एक योजना तयार करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या ३७ जिल्ह्यांपैकी १२ जिल्हे लाल विभागात असून २४ जिल्हे नारिंगी व एकच जिल्हा हरित विभागात आहे. २८ एप्रिलपासून सतत चार दिवस चेन्नईमध्ये लॉकडाऊन असून तेथे किराणा दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत.>राज्यांनी जर स्वत:च्या जबाबदारीवर कार्य करावे लागणार असेल, तर आरोग्याचा विषय त्यांना प्राधान्यक्रमाने घ्यावा लागणार आहे. काही राज्यांनी कोविडचा फैलाव होण्यापासून वेगाने उपाय योजले असले, तरी त्यांच्यावर आर्थिक बोजा बराच पडला आहे. केरळने कोविडशी लढण्यासाठी सर्वात जादा आरोग्य शिबिरे स्थापन केली आहेत.गुजरात, दिल्ली, आंध्र प्रदेशातील बिगर सरकारी संघटनांनी या काळात लक्षणीय कामगिरी बजावली. जेथे राज्य सरकारचे प्रयत्न तोकडे पडतात, तेथे त्यांनी मदतीचा हात दिला. या काळात जवळजवळ १० लाख स्थलांतरित मजुरांना अन्न पुरविण्यात आले आहे. हे त्यांचे कार्य राज्य सरकारहून अधिक आहे. विषाणूची लागण झालेल्यांचा शोध घेणे, त्यांच्यामध्ये जागृती करणे, रोजगार गेलेल्यांना आश्वस्त बनविणे, भुकेचा प्रश्न व स्थलांतरित मजुरांना सुरक्षा पुरविणे ही कामे प्रामुख्याने एनजीओंनी केली आहेत.केरळ सरकारने कोविडची लागण झपाट्याने पसरू नये, यासाठी राज्य प्रशासन ते पंचायत पातळीपर्यंत संपर्काची साखळी निर्माण केली. फैलाव रोखण्यासाठी स्थानिकांची, स्थानिक स्वराज्य संस्थांची योग्य मदत घेतली. आर्थिकदृष्ट्या विवंचनेत असलेल्यांना केरळने मदतीचा हात दिला. त्यासाठी आरोग्य सुविधा, कर्ज वाटप, कल्याणकारी वेतन, कर माफी आदी योजना राबविल्या. हा प्रयत्न राजस्थानमधील भिलवाडापेक्षाही सक्षम होता. भिलवाडा येथे लोकांचे योग्य विलगीकरण केले, त्यामुळे संसर्ग झाला नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या