शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

coronavirus : लॉकडाऊननंतर दिल्लीतून उत्तर प्रदेशाकडे मोठ्या प्रमाणावर पलायन, रस्त्यावर गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 12:11 PM

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  मात्र रोजगार जाऊन अनिश्चीतता निर्माण झाल्याने अनेक गावाकडे पलायन जात आहेत.

नवी दिल्ली - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेले लाखो मजूर आपल्या गावांच्या दिशेने पलायन करत आहेत. यापैकी अनेक जण चालत गावाच्या दिशेने निघाले आहेत, तर काहीजण उतार प्रदेश सरकारने सोय केलेल्या बसमधून गावाच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यांवर मोठी गर्दी झाली आहे. तर दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर मोठी गर्दी झाली आहे. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  मात्र रोजगार जाऊन अनिश्चीतता निर्माण झाल्याने अनेक गावाकडे पलायन जात आहेत. रस्त्यावरून पायी निघालेल्या मजुरांसाठी योगी आदित्यनाथ सरकारने विशेष बसची सुविधा सुरू केली आहे. दरम्यान, यांची माहिती कळताच लोकांची मोठी गर्दी आनंद विहार बस डेपोमध्ये झाली. गाझियाबादमधील लाल कुवा येथील बस डेपोतही अशीच मोठी गर्दी झाली होती. 

दरम्यान, देशात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. देशभरात आतापर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 900 च्या पुढे पोहोचली आहे. तर आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशासमोरही गंभीर आव्हान उभे राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत देशात लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. 

दुसरीकडे यूरोपीय देश आणि अमेरिकेत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. इटली, स्पेन, फ्रान्स, अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. संपूर्ण जगात मिळून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या 27 हजारांवर पोहोचली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNew Delhiनवी दिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेश