शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

CoronaVirus : आता उत्तर प्रदेशात लॉकडाउनचा नवा फॉर्म्युला, असा आहे योगी सरकारचा 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 13:30 IST

मुख्य सचिव राजेंद्र तिवारी यांनी शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाउनचा आदेश जारी केला होता. तेव्हापासूनच या नव्या प्लॅनचा अंदाज लावला जात होता.

ठळक मुद्देउत्तर प्रदेश सरकारने कोरोना व्हायरसचा सामना करण्यसाठी आता नव्या प्लॅनवर काम करायला सुरुवात केली आहे.उत्तर प्रदेशात दर आठवड्याला शनिवारी आणि रविवारी लॉकडाउन असेल.उत्तर प्रदेश सरकारने हा निर्णय घेण्यापूर्वीच कर्नाटक सरकारने विकेंड लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे.

लखनौ - उत्तर प्रदेश सरकारने कोरोना व्हायरसचा सामना करण्यसाठी आता नव्या प्लॅनवर काम करायला सुरुवात केली आहे. या प्लॅननुसार उत्तर प्रदेशात विकेंड लॉकडाउन फॉर्म्युला लागू करण्यात येणार आहे. यामुळे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात आता दर आठवड्याला विकेंड लॉकडाउन असेल.

उत्तर प्रदेशात दर आठवड्याला शनिवारी आणि रविवारी लॉकडाउन असेल. यात सर्व बाजार आणि कार्यालये बंद राहतील. याचाच अर्थ राज्यातील सर्व बाजार आणि कार्यालये आठवड्यातील केवळ पाच दिवसच खुली राहतील. कोरोना संकटावर मात करण्यासाठी हा नवा प्लॅन लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. लवकरच याची आधिकृत घोषणा करण्यात येईल, असे मानले जात आहे.

मुख्य सचिव राजेंद्र तिवारी यांनी शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाउनचा आदेश जारी केला होता. तेव्हापासूनच या नव्या प्लॅनचा अंदाज लावला जात होता. वीकेंडला लॉकडाउन करण्याचा हा प्लॅन बरेच दिवस चालेल. मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनीही ट्विटरवरूल यासंदर्भात संकेत दिले होते. 

सांगण्यात येते, की विकेंड लॉकडाउनचा हा निर्णय मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टीम 11च्या बैठकीतच घेण्यात आला होता. कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत चालल्याने ट्रांसमिशन साखळी तोडण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने हा निर्णय घेण्यापूर्वीच कर्नाटक सरकारने विकेंड लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही, तर कर्नाटक सरकारने याची घोषणाही केली आहे. कर्नाटकात 2 ऑगस्टपर्यंत दर शनिवार आणि रविवारी सर्व बाजार आणि कार्यालये बंद असणार आहेत.

महाराष्ट्रात कोरोना अधिक घातक -कोरोनामुळे महाराष्ट्रात शनिवारी 223 जणांचा मृत्यू झाला. याच बरोबर महाराष्ट्रातील मृतांच्या आकड्याने 10 हजारचा टप्पाही ओलांडला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 22,123 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 45 टक्के मृत्यू केवळ महाराष्ट्रात झाले आहेत.

देशभरात एकाच दिवसात २७,११४ नवे रुग्णदेशभरात शनिवारी एकाच दिवसात कोरोनाचे २७ हजार १४४ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८ लाख २० हजार ९१६ इतकी झाली आहे. या संसर्गाने आणखी ५१९ जण मरण पावले असून बळींची संख्या २२ हजार १२३ इतकी झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले. देशात अवघ्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या सात लाखांवरून आठ लाखांवर गेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : मोलकरणीच्या नावानं पाठवलं पत्नीचं Corona सॅम्पल, रिपोर्ट आला पॉजिटिव्ह!; मग...

CoronaVirus : जगातील दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये भारताचा वाटा वाढला, 'या' गोष्टींनी वाढवली देशाची चिंता

धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथChief Ministerमुख्यमंत्री