शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

CoronaVirus News: देशभरात २४ तासांत, ५० हजारांहून कमी रुग्ण, तीन महिन्यांनंतर रुग्णसंख्येत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 6:27 AM

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गत २४ तासांत ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १,१५,१९७ झाली आहे.

नवी दिल्ली : देशात जवळपास तीन महिन्यांनंतर कोरोना रुग्णांची २४ तासांतील संख्या ५० हजारांपेक्षा कमी आली आहे. गत २४ तासांत देशात ४६,७९० नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण रुग्णांची संख्या ७५,९७,०६३ एवढी झाली आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ४ कोटींवर पोहोचली असून एकूण मृत्यू ११ लाख २४ हजार झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गत २४ तासांत ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १,१५,१९७ झाली आहे. देशात यापूर्वी ५० हजारांपेक्षा कमी रुग्ण २८ जुलै रोजी दिसून आले होते. त्यादिवशी ४७,७०३ नवे रुग्ण आढळून आले होते. देशात एका दिवसात मृत्युमुखी पडणाºया रुग्णांची संख्या सलग दुसºया दिवशी ६०० पेक्षा कमी झाली आहे. देशात कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या ६७ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. तर, उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या सलग चौथ्या दिवशी ८ लाखांपेक्षा कमी झाली आहे.

एकूण रुग्ण - 7,48,538देशात उपचार घेणाºया रुग्णांची संख्या ७,४८,५३८ झाली आहे. ही संख्या रुग्णांच्या ९.८५ टक्के आहे.

देशात ६७,३३,३२८ लोक या आजारातून बरे झाले आहेत. यामुळे राष्ट्रीय स्तरावर रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ८८.६३ टक्के झाला आहे. तर, मृत्यूदर १.५२ टक्के आहे.

५७९ नव्या मृत्यूंपैकी महाराष्ट्रात १२५, कर्नाटक ६४, पश्चिम बंगाल ६३, छत्तीसगड ५६, तामिळनाडू ४९, दिल्लीत ३१ जणांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात आतापर्यंत 42,240 मृत्यू झाले आहेत. देशातील मृत्यूंपैकी ७० टक्के मृत्यू हे रुग्णाला अन्य आजार असल्यामुळे झाले आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयdocterडॉक्टर