शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : "हजारो मुलं-मुली रस्त्यावर... आज भारत माता रडतेय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 10:30 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे अनेकांना काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. 

नवी दिल्ली - कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 70,000 वर पोहोचली आहे. तर 1800 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांना काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. रोजगारासाठी, नोकरीसाठी, उद्योगासाठी आलेल्या नागरिकांनी आपला गाव गाठायला सुरुवात केली होती. जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीच्या संकटापासून वाचायचं असेल तर गाव हे सुरक्षित ठिकाण नागरिकांना वाटू लागले आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. 

'हजारो मुलं-मुली रस्त्यावर... आज भारत माता रडत आहे' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला संबोधन सुरू असताना राहुल गांधी यांनी भारत माता आज रडतेय असा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच रस्त्यांवरून पायी चालणाऱ्या लाखो कामगार बंधू-भगिनींना त्यांच्या घरी सुरक्षितपणे पोहोचवण्याची व्यवस्था करा. या संकटात दिलासा देण्यासाठी त्यांच्या खात्यात थेट 7500 रुपये जमा करा असं देखील राहुल यांनी म्हटलं आहे. 

'मुलांना लागलं तर आईलाही रडू येतं. अशी कुठलीच आई नाही जी मुलाच्या वेदना पाहून दुःखी होणार नाही. आज भारत माता रडते आहे. कारण या मातेची हजारो मुलं-मुली उपाशी पोटी रस्त्यांवर अनेक किलोमीटर पायी चालत आहेत. त्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवावं अशी माझी सरकारला विनंती आहे. तसेच सरकारने त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जमा करावेत. त्यांच्या रोजगारासाठी लघु-मध्यम उद्योग क्षेत्राला लवकरात लवकर आर्थिक पॅकेज जाहीर करावं' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना संबोधित केले. देशातील नागरिकांसाठी 20 लाख कोटींच्या पॅकेजचीही घोषणा केली. मात्र, गावाकडे, घराकडे वापस जाणाऱ्या मजुरांच्या आत्ताच्या परिस्थितीसंदर्भात मोदी काहीच बोलले नाहीत. यावरुन काँग्रेसने मोदींना लक्ष्य केले आहे. देशभरात स्थलांतरीत करत असलेल्या मजूर, कामगार, गरिब वर्गातील नागरिकांना सर्वात प्रथम मदत मिळणे गरजेचं आहे. आज आपण या कामगारांसाठी काहीतरी पॅकेज जाहीर कराल, अशी आशा होती. देश आणि राष्ट्रनिर्मित्तीसाठी कार्यरत असलेल्या मजूर आणि कष्टकरी बांधवांप्रति आपली निष्ठुरता आणि असंवेदनशीलता निराशाजनक असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. तसेच, मोदींनी जे पॅकेज जाहीर केलं ते सत्यात उतरण्याची वाट पाहात आहोत, असंही सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : मंत्री शिंकले, सगळेच घाबरले अन् पुढे झालं असं काही...

CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय 

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! 'या' शहरात 'कॅश ऑन डिलिव्हरी'वर बंदी

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 9 महिन्यांची गर्भवती नर्स करतेय कोरोनाग्रस्तांची सेवा, पंतप्रधानांनी केलं कौतुक

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेल

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; कोट्यवधी लोकांना होणार फायदा

लॉकडाऊननंतर इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल-डिझेल महागणार?; 'हे' आहे कारण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसIndiaभारतDeathमृत्यूNarendra Modiनरेंद्र मोदी