शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये 200 चिमुकल्यांचा वाचवला जीव, रक्ताचं नातं जोडणारा अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 5:16 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमध्ये अनेक जण मदतीसाठी पुढाकार घेत असून एकमेकांना मदतीचा हात देत आहेत. तब्बल 200 मुलांचा एका व्यक्तीने जीव वाचवला असून थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्यांसाठी तो देवदूत ठरला आहे.

भोपाळ - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता लॉकडाऊन 17 मेपर्यंत कायम राहणार आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 81,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 2600 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहेत. विशेषत: कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.  

लॉकडाऊनमध्ये अनेक जण मदतीसाठी पुढाकार घेत असून एकमेकांना मदतीचा हात देत आहेत. तब्बल 200 मुलांचा एका व्यक्तीने जीव वाचवला असून थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्यांसाठी तो देवदूत ठरला आहे. निर्मल संतवानी असं या व्यक्तीचं नाव असून ते मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये राहतात. लॉकडाऊन लागू झाल्यापासून ते थॅलेसेमियाग्रस्त मुलांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी झटत आहेत. निर्मल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत 6 कॅम्प लावून 173 युनिट रक्तदान केलं आहे.

ग्वालियरच्या चंबल भागातील 200 पेक्षा जास्त थॅलेसेमियाग्रस्त मुलांना वेळेत रक्त मिळाल्याने त्यांचा जीव वाचल्याची घटना समोर आली आहे. निर्मल संतवानी यांचा मुलगा करणलाही थॅलेसेमिया आहे. त्यामुळे या मुलांना रक्ताची गरज किती असते याची त्यांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे काहीही झालं तरी लॉकडाऊनमध्ये थॅलेसेमिया पीडित मुलांची मदत आपण करणार, असा ठाम निश्चय त्यांनी केला. तसेच त्यांनी लोकांशी संपर्क साधायला सुरुवात केली आणि त्यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केलं.

निर्मल यांना लोकांनीही साथ दिली. त्यामुळे लॉकडाऊनसारख्या परिस्थितीतही चंबल भागातील जवळपास 200 थॅलेसेमिया पीडित मुलांना वेळेत रक्त मिळालं आहे. थॅलेसेमिया हा आजार लहान मुलांमध्ये जन्मापासून असतो. या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांना प्रत्येकी 15 दिवसांनी रक्ताची गरज भासते. जोपर्यंत त्यांचं बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट होत नाही तोपर्यंत त्यांना रक्ताची गरज भासते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : सरकारने मागवले 'हे' खास मशीन, आता 24 तासांत होणार 1200 सँपल टेस्ट

CoronaVirus News : ... म्हणून कोरोनाला रोखण्यात 'हे' 18 देश ठरले यशस्वी

CoronaVirus News : '...म्हणून भारताची भूमिका महत्त्वाची'; मोदींसोबतच्या चर्चेनंतर बिल गेट्स यांचं ट्विट

प्रेरणादायी! व्याजाने पैसे घेऊन केली UPSC ची तयारी; IAS होऊन शेतकरी पुत्राची नेत्रदीपक भरारी

CoronaVirus News : नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली, कोरोनाग्रस्तांचा आकडा 81 हजारांवर

CoronaVirus News : अमेरिकेने केला चीनवर गंभीर आरोप; सांगितलं कोरोना पसरण्यामागचं कारण

CoronaVirus News : पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिल गेट्स यांच्याशी खास चर्चा; म्हणाले...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMadhya Pradeshमध्य प्रदेशBlood Bankरक्तपेढी