शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

CoronaVirus Live Updates : "आम्हाला कामचोर, मूर्ख म्हणतात, टोमणे मारतात"; CMO वर गंभीर आरोप करत डॉक्टरांचा सामूहिक राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 09:51 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सामूहिक राजीनामा दिल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर आतापर्यंत दोन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन कोटींवर गेली असतानाच उत्तर प्रदेशमध्ये देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच दरम्यान आता उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सामूहिक राजीनामा दिल्याची घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये या डॉक्टरांनी अपर मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. 

डॉक्टरांच्या असोसिएशनचे सचिव डॉ. संजीव कुमार यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयावर गंभीर आरोप केले आहेत. येथील अधिकारी आम्हाला कामचोर आणि मूर्ख म्हणतात असं संजीव कुमार म्हणाले आहेत. तुम्ही लोक काम करत नाही. सतत लखनऊ आणि कानपूरला पळून जाता, असे टोमणेही आम्हाला सरकारी अधिकारी मारत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. अधिकाऱ्यांकडूनच आम्हाला सहकार्य मिळत नाही. त्यांना ग्रामीण भागांमध्ये लसीकरण करण्यात अजिबात रस नाही. मात्र ते आमच्यावर टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव टाकत असतात असं देखील म्हटलं आहे. मोठ्याप्रमाणात डॉक्टरांनी राजीनामा दिल्याने कोरोना लसीकरणावर परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

"गावागावात आमच्या टीम काम करत आहेत. मात्र सरकारी पातळीवर त्याची चाचपणी करताना आम्ही काम करत नाही असं दाखवलं जात आहे. आम्ही कामचोर असल्याचं भासवलं जात आहे. जिल्हाधिकारी स्तरावर जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून आमच्या कामाची दखल घेतली जात नाही. दिवसभरामध्ये काम केलं आहे हे सिद्ध करावं लागतं. आम्ही काम करत असलो तरी आम्हीच काहीच करत नाही असं अनेकदा बोलून दाखवलं जातं. आमच्या या वागणुकीमुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर गेल्याचा दावा केला जातो" असंही कुमार यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"कुत्रे मृतदेहांचे लचके तोडताहेत, मृतदेह नदीत फेकले जाताहेत अन् योगीजी All Is Well म्हणताहेत"; काँग्रेसचा घणाघात

काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "कुत्रे मृतदेहांचे लचके तोडताहेत, मृतदेह नदीत फेकले जाताहेत अन् योगीजी All Is Well म्हणताहेत" असं म्हणत काँग्रेसने घणाघात केला आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत योगी सरकारवर निशाणा साधला आहे. "उत्तर प्रदेशमध्ये कुत्रे मृतदेहांचे लचके तोडत आहेत. कचऱ्याच्या गाड्यांमधून मृतदेह वाहून नेले जात आहेत. मृतदेह नदीत फेकले जात आहे असं असतानाही योगीजी तुम्ही सर्वकाही ठीक असल्याचं सांगत आहात. संत आणि महंत स्वप्नातही खोटं बोलत नाहीत असं म्हणतात. मात्र तुम्ही सर्वकाही ठीक आहे, असा खोटा दावा करुन, असत्य बोलून योगीजी धर्माचा आणि राजधर्माचाही अपमान करताय" असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल