शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

CoronaVirus Live Updates : निष्काळजीपणा नडला! मतदान करण्यासाठी 'तो' गावी आला, कोरोनामुळे त्याच्यासह 5 जणांनी जीव गमावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 14:55 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. रुग्णसंख्येत सातत्याने मोठी वाढ होत असल्याने कडक लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत.गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,82,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,780 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 2,06,65,148 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2,26,188 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र असे असले तरी काही जणांच्या निष्काळजीपणामुळे, हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रसार होत आहे. तसेच इतरांचाही जीव धोक्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. बीसलपूर याठिकाणी असणाऱ्या वौनी गावात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आरोग्य अधिकारी जेव्हा गावात याबाबत विचारण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांना गावकऱ्यांकडून वारंवार परत जाण्यास सांगितलं जात होतं. जेव्हा त्यांनी घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं आहे. 

एसडीएम राकेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक आरोग्य केंद्राचे अधीक्षक डॉक्टर ठाकुरदास यांना त्यांनी गावाचा दौरा करण्यास पाठवलं होतं. गावात झालेल्या मृत्यूंविषयी चौकशी करण्यासाठी आणि त्यामागील कारण शोधून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. गावातील एका व्यक्तीने त्यावेळी माहिती दिली की पंचायत निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा कोरोनामुळे चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला. अंत्यसंस्कारानंतर गावातील तीन ज्येष्ठ महिलांसह पाच जणांचा मंगळवारी मृत्यू झाला. ही माहिती मिळताच आरोग्य अधिकारी गावात पोहोचले होते.

अधिकारीच कोरोना पॉझिटिव्ह असतील या भीतीपोटी गावकऱ्यांनी त्यांना गावात येऊ दिलं नाही. त्यामुळे मृतांचं शवविच्छेदन देखील केलं गेलं नाही. यामुळे त्यांचा मृत्यू कशामुळे झाला यामागचं कारणही अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र मतदान करण्यासाठी आलेल्या त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने मृत्यू झाल्याचा संशय आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (5 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 82 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतDeathमृत्यू