शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

CoronaVirus Live Updates : निष्काळजीपणा नडला! मतदान करण्यासाठी 'तो' गावी आला, कोरोनामुळे त्याच्यासह 5 जणांनी जीव गमावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 14:55 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. रुग्णसंख्येत सातत्याने मोठी वाढ होत असल्याने कडक लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत.गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,82,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,780 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 2,06,65,148 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2,26,188 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र असे असले तरी काही जणांच्या निष्काळजीपणामुळे, हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रसार होत आहे. तसेच इतरांचाही जीव धोक्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. बीसलपूर याठिकाणी असणाऱ्या वौनी गावात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आरोग्य अधिकारी जेव्हा गावात याबाबत विचारण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांना गावकऱ्यांकडून वारंवार परत जाण्यास सांगितलं जात होतं. जेव्हा त्यांनी घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं आहे. 

एसडीएम राकेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक आरोग्य केंद्राचे अधीक्षक डॉक्टर ठाकुरदास यांना त्यांनी गावाचा दौरा करण्यास पाठवलं होतं. गावात झालेल्या मृत्यूंविषयी चौकशी करण्यासाठी आणि त्यामागील कारण शोधून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. गावातील एका व्यक्तीने त्यावेळी माहिती दिली की पंचायत निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा कोरोनामुळे चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला. अंत्यसंस्कारानंतर गावातील तीन ज्येष्ठ महिलांसह पाच जणांचा मंगळवारी मृत्यू झाला. ही माहिती मिळताच आरोग्य अधिकारी गावात पोहोचले होते.

अधिकारीच कोरोना पॉझिटिव्ह असतील या भीतीपोटी गावकऱ्यांनी त्यांना गावात येऊ दिलं नाही. त्यामुळे मृतांचं शवविच्छेदन देखील केलं गेलं नाही. यामुळे त्यांचा मृत्यू कशामुळे झाला यामागचं कारणही अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र मतदान करण्यासाठी आलेल्या त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने मृत्यू झाल्याचा संशय आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (5 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 82 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतDeathमृत्यू