शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus : कोरोना झाल्याच्या संशयातून त्यानं केली आत्महत्या; कुटुंबीयांसाठी सुसाइड नोट लिहिल्यानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 19:15 IST

गळफास घेण्यापूर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहिली होती, ती आता सापडली आहे. त्या चिठ्ठीत त्यानं मी कोरोना व्हायरस संक्रमित आहे. त्यामुळे आत्महत्या करत आहे.

उडुपीः कोरोना व्हायरसनं जगभरात खळबळ माजवली आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या लागोपाठ वाढताना दिसत आहे. अनेक जण कोरोनाच्या भीतीपायी घरातच नजरकैद झाले आहेत. कर्नाटकातूनही अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका ५७ वर्षीय व्यक्तीनं कोरोनाच्या भीतीपायी आत्महत्या केली आहे. स्वतः गळफास घेऊन त्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय होता. गळफास घेण्यापूर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहिली होती, ती आता सापडली आहे. त्या चिठ्ठीत त्यानं मी कोरोना व्हायरस संक्रमित आहे. त्यामुळे आत्महत्या करत आहे.तसेच कुटुंबीयांनीसुद्धा आपली तपासणी करून घ्यावी. कर्नाटकातल्या उडुपीच्या व्यक्तीचा घराच्या बाहेर मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. ज्यांना घरातचं होम क्वारंटाइन करण्यास सांगितलं होतं, त्यातही या व्यक्तीचं नाव नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची कोरोना व्हायरसची लक्षण आढळून आलेली नव्हती. त्या व्यक्तीला पत्नी आणि दोन मुलं आहेत. सध्या कोरोना व्हायरसच्या संशयापायी आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. भारतातही कोरोना व्हायरसनं मृत्यू झालेल्यांची संख्या १५ झाली असून, जवळपास ६००हून अधिक लोक संक्रमित झाले आहेत. महाराष्ट्रातल्या नवी मुंबईतल्या वाशी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने राज्या कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या चार झाली आहे.  महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्थांची संख्या सातत्याने वाढत आहे. काल सांगली, मुंबई, पनवेल आदी भागात कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाच्या रुगणांचा आकडा १२४वर पोहोचला आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या