शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

Coronavirus: जगातील दर दहा लाख लोकांमागे भारतात सर्वात कमी कोरोना बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 2:14 AM

एकूण रुग्णसंख्या ७२ लाखांवर; कोरोना चाचण्यांचा पल्ला ९ कोटींवर

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर असला तरी, दर दहा लाख लोकांमागे देशात फक्त ७९ जण कोरोनामुळे मरण पावतात. हे जगातील सर्वात कमी प्रमाण आहे. भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या बुधवारी ७२ लाख ३९ हजारांवर पोहोचली असून, आजवर झालेल्या कोरोना चाचण्यांनी ९ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

देशात बुधवारी कोरोनाचे ६३,५०९ नवे रुग्ण आढळून आले असून, या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या ७२,३९,३८९ झाली आहे, तर कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ६३ लाखांवर पोहोचली आहे. बरे होणाºयांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ८७.०५ टक्के आहे. कोरोनामुळे बुधवारी आणखी ७३० जण मरण पावल्याने बळींची एकूण संख्या १,१०,५८६ झाली आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सलग सहाव्या दिवशी ९ लाखांपेक्षा कमी आहे. सध्या देशात ८,२६,८७८ कोरोना रुग्ण उपचार घेत असून, बरे झालेल्यांची संख्या ६३,०१,९२७ आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५३ टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १३ आॅक्टोबर रोजी ११,४५,०१५ कोरोना चाचण्या पार पडल्या. या चाचण्यांची एकूण संख्या ९,००,९०,१२२ झाली आहे.२० राज्यांत संसर्ग होण्याचे प्रमाण राष्ट्रीय स्तराहून कमी८.१९ टक्के कोरोनाचा संसर्ग होण्याचे राष्ट्रीय स्तरावरील सरासरी प्रमाण आहे. त्यापेक्षा २० हून अधिक राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत संसर्ग होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामध्ये बिहार, गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, हरयाणा, ओदिशा, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, पश्चिम बंगाल आदींचा समावेश आहे.मुंबईतील दोघांसह तीन जणांना झाला पुन्हा संसर्गकोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा त्या विषाणूचा संसर्ग झालेले तीन रुग्ण इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेने आढळून आले आहेत. त्यातील दोन मुंबईतील व एक अहमदाबादमधील आहे. कोरोना विषाणूचा बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा संसर्ग होऊ शकतो, असे एका पाहणीत नुकतेच आढळून आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत