शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

CoronaVirus News: "...अन्यथा देशात कोरोनामुळे आतापर्यंत ६८ हजार जणांचा मृत्यू झाला असता"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 6:47 PM

आतापर्यंत देशात कोरोनाचे १ लाख २० हजाराच्या आसपास रुग्ण आढळले असून मृतांचा आकडा साडे तीन हजारांहून अधिक आहे.

नवी दिल्ली: देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या एक लाख वीस हजारांच्या आसपास पोहोचली असून मृतांचा आकडा साडे तीन हजारांच्या मागे गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात जवळपास दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे कोरोना संक्रमणाचा वेग कमी झाल्याचं कोरोनाला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्समधील एका गटानं म्हटलं आहे. लॉकडाऊन योग्य वेळी जाहीर केला नसता, तर सध्या देशातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा नेमका किती असता, याची माहिती या गटानं दिली आहे.कोरोनाला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्समधील गटाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊनमुळे संक्रमणाचा वेग घटल्याचं मत व्यक्त केलं. 'लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या प्रसारचा वेग घटला. लॉकडाऊन नसता, तर कोरोना रुग्णांचा संख्या खूप जास्त असती. लॉकडाऊनमुळे रुग्णांसोबतच मृतांचा आकडादेखील घटला. अन्यथा आजच्या घडीला देशात ३७ ते ६८ हजार जणांचा मृत्यू झाला असता. तर बाधितांची संख्या १४ ते २९ लाख असती,' असं पॉल म्हणाले. देशातले ८० टक्के कोरोना रुग्ण केवळ पाच राज्यांमध्ये आहेत. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, दिल्ली आणि मध्य प्रदेशचा समावेश होतो. देशातले ९० टक्क्यांहून अधिक कोरोना बाधित १० राज्यांमध्ये असून उर्वरित राज्यांमधील कोरोनाबाधितांची संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचं पॉल यांनी सांगितलं. मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, ठाणे पुणे, इंदूर, कोलकाता, हैदराबाद आणि औरंगाबाद या १० शहरांमध्ये कोरोनाचे ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण असल्याची माहिती पॉल यांनी दिली.पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका"केंद्राने ४६८ कोटी दिले, पण ठाकरे सरकार एक दमडीचंही पॅकेज द्यायला तयार नाही"भाजपाच्या आंदोलनाला एकनाथ खडसेंनी असा दिला प्रतिसाद....

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या