शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus: कोरोनाचा हॉटस्पॉट बनवलेल्या या शहरातून आली गुड न्यूज, नव्या रुग्णांचे प्रमाण घटले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 14:05 IST

लॉकडाऊनमुळे देशात कोरोनाचा सार्वत्रिक फैलाव झाला नसला तरी काही ठिकाणी कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत महिनाभरापूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या एका शहरातून गुडन्यूज आली आहे.

इंदूर - कोरोना विषाणूच्या वेगाने होत असलेल्या फैलावामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. लॉकडाऊनमुळे देशात कोरोनाचा सार्वत्रिक फैलाव झाला नसला तरी काही ठिकाणी कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत महिनाभरापूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या इंदूरमधून आता एक दिलासादायक बातमी आली आहे. या शहरात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले असून, रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधीही वाढला आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्यानंतर त्याचा सर्वाधिक प्रकोप मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये दिसून आला होता. येथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. आतापर्यंत इंदूरमध्ये कोरोनाचे १६५४ रुग्ण सापडले असून, ७९ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र गेल्या १७ दिवसांपासूनची आकडेवारी पाहिल्यास इंदूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक घटत चालली आहे. तसेच राष्ट्रीय सरासरीचा विचार केल्यास कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेगही कमी झाला आहे. त्यामुळे इंदूर कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे.  

याबाबत अधिक माहिती देताना इंदूरचे सीएचएमओ डॉ. प्रवीण जडिया यांनी सांगितले की, कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा इंदूरची स्थिती चांगली आहे. शहरामध्ये कठोरपणे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन यासाठी उपयुक्त ठरले, अशी माहिती त्यांनी दिली.  

इंदूरमध्ये आशा, एएनएम आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या सुमारे दोन हजार पथकांनी गेल्या महिन्यात पाच लाखांहून अधिक घरांचा सर्वे केला. या लोकांनी कोरोनाबाबत जनजागृती करतानाच संशयितांबाबत योग्य माहितीही गोळा केली, त्यामुळे फार मदत झाली, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.  

महत्त्वाच्या बातम्या

coronavirus: अजबच! या देशात माणसांसोबत बकरी आणि फळेही कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus: मुलीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांतच ती झाली कर्तव्यावर हजर

coronavirus: गुजरातमधील सूरत येथे मजुरांकडून पुन्हा गोंधळ, पोलिसांवर केली दगडफेक

 

दरम्यान, देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 46 हजार 433 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1568 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये आतापर्यत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरात गेल्या 24 तासांमध्ये 3900 नवे रुग्ण आढळले असून 195 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळण्यास सुरुवात झाल्यापासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. देशभरात करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली 46, 433 वर, तर त्यांपैकी 12,727 रुग्ण बरे झाले आहे. तर आता एकूण 32,134 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. गेल्या काही दिवसांपासून भारताचा मृत्यूदर कमी झाला होता. मात्र आता पुन्हा मृत्यूदरात वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारतCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या