शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

coronavirus: कोरोनाबाधितांच्या संख्येत बेसुमार वाढ, या राज्यात पुन्हा होणार कडक लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 16:20 IST

अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाल्यापासून काही राज्यांमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत बेसुमार वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला लगाम घालण्यासाठी काही राज्ये आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेऊ लागली आहेत.

ठळक मुद्देपूर्वोत्तर भारतातील आसाममध्येही २८ जूनपासून पुन्हा लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहेगुवाहाटीमध्ये २८ जूनच्या मध्यरात्रीपासून १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू राहीलआसामच्या इतर भागाताही आठवडाभरासाठी लॉकडाऊन लागू राहील

गुवाहाटी - सुमारे सव्वादोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर जून महिन्याच्या सुरुवातीपासून देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाल्यापासून काही राज्यांमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत बेसुमार वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला लगाम घालण्यासाठी काही राज्ये आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेऊ लागली आहेत.

पूर्वोत्तर भारतातीलआसाममध्येही २८ जूनपासून पुन्हा लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. गुवाहाटीमध्ये २८ जूनच्या मध्यरात्रीपासून १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू राहील. तर आसामच्या इतर भागाताही आठवडाभरासाठी लॉकडाऊन लागू राहील, असे आसामचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितले.

लॉकडाऊनबाबत माहिती देताना हेमंत बिस्व शर्मा म्हणाले की, शुक्रवारपासून आसाममध्ये रात्रीच्या वेळी १२ तासांची संचारबंदी लागू करण्यात येईल. त्यानंतर शनिवारपासून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू केले जाईल. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांना सूट दिली जाईल. लॉकडाऊन दरम्यान काही परिसरांमध्ये लोकांच्या वर्दळीवर निर्बंध घालण्यात येतील. तसेच सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये बंद राहतील. सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहील. तसेच खासगी वाहनांनाही परवानगी दिली जाणार नाही.  सर्व मंदिरेसुद्धा बंद राहतील. तसेच केवळ अत्यावश्यक सेवानांचा परवानगी दिली जाईल.

आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला आहे. आजही राज्यात कोरोनाचे २७६ नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ६ हजार ६४६ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी चार हजार ३३ रुग्ण बरे झाले आहेत. तर नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २६०१ आहे.

दरम्यान, देशभरातही कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा प्रचंड वाढ झाली आहे. काल दिवसभरात देशामध्ये कोरोनाचे तब्बल १७ हजार २९६ नवे रुग्ण सापडले आहे. तर देशभरात ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या चार लाख ९० हजार ४०१ झाली आहे. तर आतापर्यंत देशात १५ हजार ३०१  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  

मात्र या सर्वामध्ये दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात १ लाख ८९ हजार ४६३ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAssamआसामIndiaभारत