शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

coronavirus: कोरोनाबाधितांच्या संख्येत बेसुमार वाढ, या राज्यात पुन्हा होणार कडक लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 16:20 IST

अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाल्यापासून काही राज्यांमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत बेसुमार वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला लगाम घालण्यासाठी काही राज्ये आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेऊ लागली आहेत.

ठळक मुद्देपूर्वोत्तर भारतातील आसाममध्येही २८ जूनपासून पुन्हा लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहेगुवाहाटीमध्ये २८ जूनच्या मध्यरात्रीपासून १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू राहीलआसामच्या इतर भागाताही आठवडाभरासाठी लॉकडाऊन लागू राहील

गुवाहाटी - सुमारे सव्वादोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर जून महिन्याच्या सुरुवातीपासून देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाल्यापासून काही राज्यांमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत बेसुमार वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला लगाम घालण्यासाठी काही राज्ये आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेऊ लागली आहेत.

पूर्वोत्तर भारतातीलआसाममध्येही २८ जूनपासून पुन्हा लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. गुवाहाटीमध्ये २८ जूनच्या मध्यरात्रीपासून १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू राहील. तर आसामच्या इतर भागाताही आठवडाभरासाठी लॉकडाऊन लागू राहील, असे आसामचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितले.

लॉकडाऊनबाबत माहिती देताना हेमंत बिस्व शर्मा म्हणाले की, शुक्रवारपासून आसाममध्ये रात्रीच्या वेळी १२ तासांची संचारबंदी लागू करण्यात येईल. त्यानंतर शनिवारपासून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू केले जाईल. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांना सूट दिली जाईल. लॉकडाऊन दरम्यान काही परिसरांमध्ये लोकांच्या वर्दळीवर निर्बंध घालण्यात येतील. तसेच सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये बंद राहतील. सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहील. तसेच खासगी वाहनांनाही परवानगी दिली जाणार नाही.  सर्व मंदिरेसुद्धा बंद राहतील. तसेच केवळ अत्यावश्यक सेवानांचा परवानगी दिली जाईल.

आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला आहे. आजही राज्यात कोरोनाचे २७६ नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ६ हजार ६४६ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी चार हजार ३३ रुग्ण बरे झाले आहेत. तर नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २६०१ आहे.

दरम्यान, देशभरातही कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा प्रचंड वाढ झाली आहे. काल दिवसभरात देशामध्ये कोरोनाचे तब्बल १७ हजार २९६ नवे रुग्ण सापडले आहे. तर देशभरात ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या चार लाख ९० हजार ४०१ झाली आहे. तर आतापर्यंत देशात १५ हजार ३०१  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  

मात्र या सर्वामध्ये दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात १ लाख ८९ हजार ४६३ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAssamआसामIndiaभारत