शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनाबाधितांच्या संख्येत बेसुमार वाढ, या राज्यात पुन्हा होणार कडक लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 16:20 IST

अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाल्यापासून काही राज्यांमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत बेसुमार वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला लगाम घालण्यासाठी काही राज्ये आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेऊ लागली आहेत.

ठळक मुद्देपूर्वोत्तर भारतातील आसाममध्येही २८ जूनपासून पुन्हा लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहेगुवाहाटीमध्ये २८ जूनच्या मध्यरात्रीपासून १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू राहीलआसामच्या इतर भागाताही आठवडाभरासाठी लॉकडाऊन लागू राहील

गुवाहाटी - सुमारे सव्वादोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर जून महिन्याच्या सुरुवातीपासून देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाल्यापासून काही राज्यांमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत बेसुमार वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला लगाम घालण्यासाठी काही राज्ये आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेऊ लागली आहेत.

पूर्वोत्तर भारतातीलआसाममध्येही २८ जूनपासून पुन्हा लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. गुवाहाटीमध्ये २८ जूनच्या मध्यरात्रीपासून १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू राहील. तर आसामच्या इतर भागाताही आठवडाभरासाठी लॉकडाऊन लागू राहील, असे आसामचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितले.

लॉकडाऊनबाबत माहिती देताना हेमंत बिस्व शर्मा म्हणाले की, शुक्रवारपासून आसाममध्ये रात्रीच्या वेळी १२ तासांची संचारबंदी लागू करण्यात येईल. त्यानंतर शनिवारपासून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू केले जाईल. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांना सूट दिली जाईल. लॉकडाऊन दरम्यान काही परिसरांमध्ये लोकांच्या वर्दळीवर निर्बंध घालण्यात येतील. तसेच सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये बंद राहतील. सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहील. तसेच खासगी वाहनांनाही परवानगी दिली जाणार नाही.  सर्व मंदिरेसुद्धा बंद राहतील. तसेच केवळ अत्यावश्यक सेवानांचा परवानगी दिली जाईल.

आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला आहे. आजही राज्यात कोरोनाचे २७६ नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ६ हजार ६४६ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी चार हजार ३३ रुग्ण बरे झाले आहेत. तर नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २६०१ आहे.

दरम्यान, देशभरातही कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा प्रचंड वाढ झाली आहे. काल दिवसभरात देशामध्ये कोरोनाचे तब्बल १७ हजार २९६ नवे रुग्ण सापडले आहे. तर देशभरात ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या चार लाख ९० हजार ४०१ झाली आहे. तर आतापर्यंत देशात १५ हजार ३०१  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  

मात्र या सर्वामध्ये दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात १ लाख ८९ हजार ४६३ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAssamआसामIndiaभारत