शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
3
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
4
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
5
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
6
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
7
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
8
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
9
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
10
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
11
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
12
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
13
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
14
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
15
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
16
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
17
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
18
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
19
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
20
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus भविष्याची चिंता नको; कोणालाही नोकरीतून काढणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 05:38 IST

कर्मचाऱ्यांना दिलासा; अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचा निर्णय

बंगळुरू : कोरोनाची साथ व टाळेबंदी असेपर्यंत कोणालाही सेवेतून कमी करण्यात येणार नाही, असे आश्वासन अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहे. भारतातही या कंपन्यांचे ठळक अस्तित्व आहे. त्यातील काही कंपन्यांनी ९० दिवस, तर काही कंपन्यांनी यंदाच्या वर्षाच्या अखेरीपर्यंत कोणालाही नोकरीतून काढणार नाही. तसेच, नवीन भरतीचे प्रमाण कमी केले जाईल.


सॅप, मॉर्गन स्टॅनले, सेल्सफोर्स, पालो आॅल्टो नेटवर्क्स, पायपाल, सिटी ग्रुप, जेपी मॉर्गन, बँक आॅफ अमेरिका, बुझ अ‍ॅलेन हॅमिल्टन आदी कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. जेपी मॉर्गन इंडिया या कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, कोरोना साथीच्या काळात कोणालाही नोकरीवरून न काढण्याचा निर्णय आमच्या कंपनीने घेतला आहे. तसेच, काही जागांसाठी नवीन भरती केली जाणार नाही व काही ठिकाणी थोड्या प्रमाणात भरती केली जाईल. जेपी मॉर्गनचे भारतात ३४ हजार कर्मचारी आहेत. सॅप कंपनीने कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून ९० दिवसांपर्यंत कोणालाही नोकरीतून कमी न करण्याचे ठरविले आहे. या कंपनीचे भारतात १३ हजार कर्मचारी आहेत. मॉर्गन स्टॅनले या कंपनीचे सीईओ जेम्स गोर्मन यांनी म्हटले आहे की, यंदा आम्ही एकाही कर्मचाºयाला नोकरीतून कमी करणार नाही. या कंपनीचे भारतात ३,३०० कर्मचारी आहेत. सेल्सफोर्स कंपनीचे सीइओ मार्क बेनिआॅफ यांनी सांगितले, की कोरोनाची साथ पसरल्यापासून ९० दिवसांपर्यंत फारशी नोकरकपात करणार नाही. बुझ अ‍ॅलेन हॅमिल्टन कंपनीनेही १ जुलैपर्यंत कोणालाही नोकरीतून न काढण्याचा निर्णय घेतला आहे. (वृत्तसंस्था)

पगार कापणार नाही : फ्लिपकार्ट
बंगळुरू : लॉकडाऊनमुळे देशातील सर्व व्यवहार बंद आहेत. अनेक कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होमद्वारे काम सुरू आहे. अशातच अनेकांचे रोजगार जाण्याची भीती व्यक्त केली जात असताना फ्लिपकार्टने मात्र कोणत्याही कर्मचाºयाचा पगार कापणार नाही, तसेच कोणालाही कामावरून कमी केले जाणार नाही, असे म्हटले आहे. फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी काही मोजक्या स्टाफसोबत घेतलेल्या बैठकीत हे आश्वासन दिले आहे. तसेच फ्लिपकार्टमध्ये इंटर्नशिप करणाºया उमेदवारांचेदेखील काहीही नुकसान होऊ दिले जाणार नाही, असेही फ्लिपकार्टने म्हटले आहे. आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, कुणीही घाबरण्याचे कारण नाही. आमचे प्राधान्य कर्मचाºयांच्या आरोग्याला आहे. सर्वांनी स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असेही या बैठकीत सांगण्यात आल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. कोरोनामुळे अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारीकपात किंवा पगारकपात करण्याबाबत बातम्या येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचे समजते. कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. मात्र, या काळातदेखील आपले ग्राहक सांभाळून ठेवणे, हे आपले कौशल्य आहे. ग्राहकांसोबतची आपली नाळ तुटू न देता ज्यांना जसे शक्य आहे, त्याप्रमाणे कार्यरत राहावे. त्यासाठी आॅनलाइन किंवा आॅफलाइन पद्धतीने कंपनीसोबत आपण सगळे जोडलेले राहू शकता, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.

कोरोनाग्रस्तांसाठी मदत निधी‘पालो आॅल्टो नेटवर्क्स’चे सीईओ निकेश अरोरा यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या काळात
आमच्या कंपनीतील एका कर्मचाºयाच्या नोकरीवर गदा येणार नाही. अमेरिका, तेल अविव, भारतामध्ये मिळून
या कंपनीचे सात हजार कर्मचारी आहेत. या कंपनीने कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी एक ा निधीची
स्थापना केली आहे. त्यासाठी व्यवस्थापन ४० लाख डॉलर देणार आहे.
४कोरोना साथीच्या काळात कमी काम व कमी नफा असूनही अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या कर्मचाºयांना विशिष्ट मुदतीपर्यंत नोकरीतून कमी न करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसjobनोकरी