शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होममुळे वाढला कौटुंबिक हिंसाचार, अनेक राज्यातून आल्या तक्रारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 12:47 PM

लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे कौटुंबिक हिंसाचारामध्ये वाढ झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्दे24 मार्चपासून देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली असून, त्यामुळे देशातील बहुतांश लोक घरीच आहेत24 मार्चनंतर कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे वाढली आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीकाही विकृत मनोवृत्तीचे लोक भोजन आणि अन्य अत्यावश्यक वस्तूंचे निमित्त काढून फिरत आहेत आणि मुलींसोबत गैरवर्तन आणि छेडछाड करत आहेत

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानुसार 24 मार्चपासून देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली असून, त्यामुळे देशातील बहुतांश लोक घरीच आहेत. त्यातही अनेक आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा दिली आहे. मात्र लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे कौटुंबिक हिंसाचारामध्ये वाढ झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. 24 मार्चनंतर कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे वाढली आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिल्लीतील डीसीपी (अॉपरेशन्स अँड कम्युनिकेशन) एसके सिंह यांनी सांगितले की, "देशाच्या राजधानीत महिलांसोबत होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांसंदर्भात येणाऱ्या फोन कॉलमध्ये वाढ होणे आमच्यासाठी धक्कादायक आहे. याआधी आम्हाला कौटुंबिक हिंसाचार आणि छेडछाडीसंदर्भातील फोन दरदिवशी सुमारे 900 ते 1000 या प्रमाणात येत असत. मात्र लॉकडाऊननंतर आम्हाला येणाऱ्या फोनकॉल्सची संख्या वाढून 1000 ते 1200 एवढी झाली आहे.

काही महिलांनी दिल्लीतील जेजे कॉलनीजवळून फोन केला आहे. त्यातून त्यांनी आपल्या शेजाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. काही विकृत मनोवृत्तीचे लोक भोजन आणि अन्य अत्यावश्यक वस्तूंचे निमित्त काढून फिरत आहेत आणि मुलींसोबत गैरवर्तन आणि छेडछाड करत आहेत, अशा आशयाच्या तक्रारी येत आहेत.  मात्र लॉकडाऊनमुळे महिलांना घराबाहेर पडून तक्रार करणे शक्य होत नाही आहे, मात्र महिलांकडून येणाऱ्या फोनकॉल्सचे प्रमाण वाढले आहे

टॅग्स :Domestic Violenceघरगुती हिंसाcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीIndiaभारत