शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

Coronavirus: सोनिया अन् राहुल गांधींवर का भडकली भिलवाडा गावातील ‘ही’ महिला सरपंच?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 1:25 PM

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकार आणि राहुल गांधी यांना या लढाईचं श्रेय दिलं

ठळक मुद्देकोरोना रोखण्याबाबत भिलवाडा पॅटर्न देशभरात प्रसिद्ध ही वेळ राजकीय स्वार्थ साधण्याची नव्हेभिलवाडाच्या देवरिया गावच्या सरपंच भडकल्या

जयपूर – जगभरात दहशत पसरलेल्या कोरोना व्हायरसने १७ लाखांहून अधिक लोकांना जाळ्यात ओढलं आहे तर १ लाखांहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचे ७ हजारांहून जास्त रुग्ण आढळले आहेत तर २३० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अशातच कोरोनाच्या लढाईत राजस्थानच्या भिलवाडा गावाचा पॅटर्न नावारुपाला आला.

भिलवाडा गाव देशातलं पहिलं कोरोना हॉटस्पॉट होतं. मात्र आता इथली परिस्थिती सुधारली आहे. या गावात गेल्या ८ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळून आला नाही तर सुरुवातीच्या २७ रुग्णापैकी १३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भिलवाडाचं कौतुक करत देशभरात भिलवाडा पॅटर्न राबवण्यासाठी माहिती मागवली आहे. कोरोना पूर्णपणे रोखण्यास भिलवाडा गावाला यश आलं. प्रशासनाने संपूर्ण सक्तीने याठिकाणी स्किनिंग केले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. त्यामुळे याचं श्रेय लाटण्यासाठी अनेकांनी उडी घेतली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकार आणि राहुल गांधी यांना या लढाईचं श्रेय दिलं त्यामुळे भिलवाडाच्या देवरिया गावच्या सरपंच किस्मत गुर्जर या नाराज झाल्या. त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सोनिया गांधीच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. किस्मत गुर्जर म्हणतात की, आज जो भिलवाडा पॅटर्न प्रसिद्ध झालाय त्याच्यामागे शेतकरी, महिला, गावकरी आणि भिलवाड्यातील स्वयसेवी संस्था यांची मेहनत आहे. मागील काही दिवसांपासून राज्य सरकार यांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या लोकांनी कोरोनाशी लढण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केले, याठिकाणी लोकांनी फक्त लॉकडाऊनचं पालन केले नाही तर सोशल डिस्टेंसिग आणि स्वच्छतेचीही काळजी घेतली. ही वेळ राजकीय स्वार्थ साधण्याची नव्हे तर सतर्कता आणि संयम ठेवण्याची आहे असं त्या म्हणाल्या.

काय आहे भिलवाडा पॅटर्न?

भिलवाडा पॅटर्न हा आरोग्य विभाग, पोलीस आणि प्रशासन यांच्या संयुक्त सुसंवादाचा एक चांगलं उदाहरण आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सर्व मेडिकल कॉलजमध्ये आरआरटीचं गठण केले होते. भिलवाडा जिल्हाधिकारी राजेंद्र भट यांच्या नेतृत्वात आरआरटी काम करत होती. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडताच तातडीने आरआरटी(Rapid Response Team)  त्या परिसरात पाठवली जात होती. १, ३ आणि ५ किमी परिसरात कर्फ्यू आणि महाकर्फ्यू लावला जात असे. प्रत्येक घरातील सदस्यांची २ ते ३ वेळा स्क्रिनिंग केली जात होती. जर कोणामध्ये लक्षण आढळले तर १४ दिवसांसाठी क्वारंटाईन केले जात असे. आयसोलेशन वार्डमध्ये ठेवलं जात असे. मोठ्या प्रमाणात संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात. अशाप्रकारे काम केल्यामुळे गेल्या ८ दिवसात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSonia Gandhiसोनिया गांधीRajasthanराजस्थान