शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

coronavirus : लॉकडाऊनमुळे देश थांबला, दिल्ली, बिहारपासून मुंबईपर्यंत सर्वत्र शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 10:01 IST

एकीकडे संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक थांबवलेली आहे, तर अनेक भागात दैनंदिन व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्यांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देशातील विविध राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एकीकडे संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक थांबवलेली आहे, तर अनेक भागात दैनंदिन व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. अगदी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपासून महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पंजाब अशा सर्वच राज्यात बहुतांश ठिकाणी आज सकाळपासून शुकशुकाट दिसून येत आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी लॉकडाऊनची घोषणा केली होती. रविवारी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर आज सोमवारी सकाळीही अनेकजण घरातच राहणे पसंत करत आहेत. काही तुरळक अपवाद वगळता रस्त्यावर वाहनांची वर्दळही तुरळक दिसत आहे.  राजधानी दिल्लीलाही कोरोना विषाणूचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे.  त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी 6 वाजल्यापासून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दिल्लीत मेट्रो तसेच इतर सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत सकाळीपासूनच शुकशुकाट दिसून येत आहे. 

महाराष्ट्र आणि दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. बिहारमधील शहरांमधील वर्दळ मंदावली आहे. 

तर उत्तर प्रदेशमधील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेक जणांकडून भाजीपाला खरोदी केला जात असल्याचे दिसत आहे. 

दक्षिण भारतातही लॉकडाऊनचा परिणाम दिसू लागला आहे. दक्षिणेकडे अनेक शहरे पूर्णपणे बंद आहेत. तसेच लागते लोकांची वर्दळही मंदावली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत