शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : लॉकडाऊनमुळे देश थांबला, दिल्ली, बिहारपासून मुंबईपर्यंत सर्वत्र शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 10:01 IST

एकीकडे संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक थांबवलेली आहे, तर अनेक भागात दैनंदिन व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्यांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देशातील विविध राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एकीकडे संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक थांबवलेली आहे, तर अनेक भागात दैनंदिन व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. अगदी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपासून महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पंजाब अशा सर्वच राज्यात बहुतांश ठिकाणी आज सकाळपासून शुकशुकाट दिसून येत आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी लॉकडाऊनची घोषणा केली होती. रविवारी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर आज सोमवारी सकाळीही अनेकजण घरातच राहणे पसंत करत आहेत. काही तुरळक अपवाद वगळता रस्त्यावर वाहनांची वर्दळही तुरळक दिसत आहे.  राजधानी दिल्लीलाही कोरोना विषाणूचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे.  त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी 6 वाजल्यापासून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दिल्लीत मेट्रो तसेच इतर सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत सकाळीपासूनच शुकशुकाट दिसून येत आहे. 

महाराष्ट्र आणि दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. बिहारमधील शहरांमधील वर्दळ मंदावली आहे. 

तर उत्तर प्रदेशमधील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेक जणांकडून भाजीपाला खरोदी केला जात असल्याचे दिसत आहे. 

दक्षिण भारतातही लॉकडाऊनचा परिणाम दिसू लागला आहे. दक्षिणेकडे अनेक शहरे पूर्णपणे बंद आहेत. तसेच लागते लोकांची वर्दळही मंदावली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत