शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

Coronavirus: कोरोना रुग्णसंख्येत भयावह वाढ, या राज्यात कठोर विकेंड लॉकडाऊन, केंद्रही पथक पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 11:45 AM

Coronavirus in Kerala: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असतानाच आता पुन्हा एकदा काही राज्यांमधून कोरोनाच्या रुग्णसंख्येने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे.

तिरुवनंतपुरम - देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असतानाच आता पुन्हा एकदा काही राज्यांमधून कोरोनाच्या रुग्णसंख्येने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. (Coronavirus in Kerala) देशातील इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली असताना केरळमध्ये मात्र कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कोरोनाच्या रुग्णांची ही वाढती संख्या लक्षात घेऊन केरळ सरकारने या आठवड्यापासून विकेंड लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलमधील सहा सदस्यांना केरळमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. (Corona outbreak, severe weekend lockdown in Kerala)

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, केरळमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत हे पथक कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या व्यवस्थापनामध्ये राज्यात सुरू असलेल्या प्रयत्नांना मदत करेल. केरळमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मात्र अन्य भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे.

केरळमध्ये बुधवारी कोरोनाच्या २२ हजार ०५६ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून ३३ लाख २७ हजार ३०१ झाली आहे. तर १३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने या विषाणूमुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या १६ हजार ४५७ एवढी झाली आहे. तर काल दिवसभरात १७ हजार ७६१ जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ३१ लाख ६० हजार ८०४ एवढी झाली आहे.

दरम्यान, भारतामध्ये गेल्या २४ तासांमध्ये ४३ हजार ५०९ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर याच काळात ३८ हजार ४६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रिकव्हरी रेटचा विचार केल्यास तो ९७.३८ टक्के आहे. भारतामध्ये अद्याप कोरोनाचे ४ लाख, ०३ हजार ८४० सक्रिय रुग्ण आहेत. देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट हा ५ टक्क्यांखाली २.३८ टक्के आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट हा २.५२ टक्के नोंदवला गेला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ६४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशातील ४३ लाख, ९२ हजार ६९७ जणांना कोरोनाविरोधातील लस मिळाली आहे. आतापर्यंत देशातील ४५ कोटी ०७ लाख ०६ हजार २५७ जणांचे लसीकरण झाले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळHealthआरोग्यIndiaभारत