शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

CoronaVirus: “परदेशातून आलेल्या मदतीचे पुढे काय झाले?” राहुल गांधींचा केंद्राला थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 17:34 IST

CoronaVirus: काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला जाब विचारला असून, ५ प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे म्हटले आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींची केंद्र सरकारला विचारणापरदेशातून आलेल्या मदतीवर उपस्थित केले प्रश्नचिन्हभारत सरकारकडे प्रश्नांची उत्तरे आहेत का - राहुल गांधी

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम दिसत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा मोठा तुडवटा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातील अनेक व्यक्ती, संघटनांनी भारताला कोरोनाच्या संकटात मोठी मदत केली. यावरून आता काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला जाब विचारला असून, ५ प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे म्हटले आहे. (coronavirus congress rahul gandhi asked 5 questions to center govt about foreign aid)

राहुल गांधींना अलीकडे कोरोना झाल्याची माहिती मिळाली होती. राहुल गांधी गृह विलगीकरणात असून, ट्विटरवरून त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. परदेशातून भारताला मिळालेल्या मदतीवरून राहुल गांधी यांनी भारत सरकारला ५ प्रश्न विचारले असून, यासंदर्भात काही उत्तरे आहेत का, अशी विचारणा केली आहे. 

परदेशातून आलेल्या मदतीचे पुढे काय झाले?

आत्तापर्यंत भारताला कोणकोणत्या गोष्टींचा पुरवठा झाला?, त्या गोष्टी कुठे आहेत?, त्याचा फायदा कोणाकोणाला होत आहे? त्यांचे राज्यांना कशा पद्धतीने वाटप झाले आहे? या सगळ्यात पारदर्शकता का नाही?, असे ५ प्रश्न राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारले आहेत. भारत सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे देशासमोर आता लॉकडाउन करण्याशिवाय अन्य पर्याय उरलेला नाही, असे राहुल गांधी यांनी यापूर्वी म्हटले होते. 

देवदूत! पंक्चर काढणाऱ्याने ६० वर्षीय नागरिकाने दिले ९० ऑक्सिजन सिलेंडर; रुग्णांना दिलासा  

कडक लॉकडाऊन अनिवार्य

वीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही. कडक लॉकडाऊन अनिवार्य आहे. देशात आताच्या घडीला रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे. आक्रमक कार्यपद्धती स्वीकारून रुग्णसंख्या कमी करणे आणि मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन करणे या तीन गोष्टींवर सर्वाधिक भर देण्याची आवश्यकता आहे. आपण माणसामाणसांतील संपर्क टाळू शकलो, तर रुग्णसंख्या कमी होऊ शकते, असे एम्सचे डॉ. गुलेरिया यांनी नमूद केले. 

“भविष्यात OBC मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा...”

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत सरकार आधीपासूनच सतर्क राहिले असते, तर त्यांनी तसे नियोजन केले असते. मात्र, दुसऱ्या लाटेबाबत गाफील राहिल्यामुळेच कोरोनाचा देशात कहर झाला आहे. सरकारमधील कमकुवत नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव यामुळे कोरोच्या दुसऱ्या लाटेने देशात मोठे नुकसान केले, अशी कठोर टीका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOxygen Cylinderऑक्सिजनRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण