शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus : मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात, कर्मचाऱ्यांनाही 50 ते 60 टक्केच वेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 11:31 IST

CoronaVirus : देशात आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी काही राज्यांनी आपल्या बजेटमध्ये बदल केले आहे.

हैदराबाद : देशात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. तसेच, देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. देशात आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी काही राज्यांनी आपल्या बजेटमध्ये बदल केले आहे. त्यानुसार सरकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात करण्यात आली आहे. तेलंगणानंतर आता आंध्र प्रदेशातील राज्य सरकारने यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. 

आंध्र प्रदेश सरकारच्या निर्यणानुसार मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि सर्व आमदारांच्या वेतनात १०० टक्क्यांची कपात केली जाणार आहे. ही कपात राज्यात आलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी करण्यात आली आहे. याशिवाय, राज्यातील सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या (IAS-IPS-IFS) वेतनात ६० टक्के कपात करण्यात येणार आहे. इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ५० टक्के आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १० टक्के कपात केली जाणार आहे.

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी देशातील इतर राज्यांनी अनेक योजना आखल्या आहेत. तसेच, आंध्र प्रदेश सरकारच्या निर्णयानुसार लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकारनेही आपल्या राज्यातील लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात केली आहे. तर महाराष्ट्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.

आंध्र प्रदेशात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. मंगळवारी राज्यात कोरोनाचे १२ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. आंध्र प्रदेशात ४० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAndhra Pradeshआंध्र प्रदेश