शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

coronavirus: परदेशात अडकलेल्या १४ हजार भारतीयांना ६४ विमानांमधून परत आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 17:03 IST

कोरोनामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक जवळपास बंद आहे. त्यामुळे नोकरीधंद्यानिमित्त परदेशात स्थायिक झालेले लाखो भारतीय नागरिक विदेशात अडकून पडले आहेत.

ठळक मुद्देपरदेशात अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहेयापैकी अनेक उड्डाणे एअर इंडियाच्या नेतृत्वात केली जातीलएका विमानात २०० ते ३०० प्रवाशांना बसण्याची परवानगी दिली जाणार आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण जगात आरोग्य आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक जवळपास बंद आहे. त्यामुळे नोकरीधंद्यानिमित्त परदेशात स्थायिक झालेले लाखो भारतीय नागरिक विदेशात अडकून पडले आहेत. दरम्यान, परदेशात अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पुढच्या आठवड्यात तब्बल ६४ विमानांमधून परदेशात अडकलेल्या १४ हजार ८०० भारतीयांना परत आणले जाणार आहे.

 या मोहिमेची सुरुवात बुधवारपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत अमेरिका, कुवेत, फिलिपिन्स, बांगलादेश, सौदी अरेबिया, मलेशिया आणि संयुत्च अरब अमिरातीसाठी विशेष उड्डाणे होणार आहेत. यापैकी अनेक उड्डाणे एअर इंडियाच्या नेतृत्वात केली जातील. तसेच एका विमानात २०० ते ३०० प्रवाशांना बसण्याची परवानगी दिली जाणार आहे.  

परदेशात अडकलेल्या लोकांना परत आणण्याच्या मोहिमेंतर्गत पहिल्या दिवशी १० विमानांमधून २ हजार ३०० लोकांना परत आणले जाईल. भारतातून निघालेली ही विमाने अमेरिका, फिलिपिन्स, सिंगापूर, बांगलादेश, यूएई, ब्रिटन, सौदी अरेबिया, कतार, ओमान, बहरीन आणि कुवेतसारख्या देशामधून लोकांना घेऊन येतील.  

महत्त्वाच्या बातम्या

बाळासाहेब, इंदिरा, पवार, लालूप्रसाद... राज ठाकरेंनी शेअर केली स्वतः काढलेली दुर्मिळ अर्कचित्रं

coronavirus: अजबच! या देशात माणसांसोबत बकरी आणि फळेही कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus: मुलीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांतच ती झाली कर्तव्यावर हजर

 

दुसऱ्या दिवशी सुमारे २ हजार ५० भारतीयांना नऊ विविध देशांमधून चेन्नई, कोची, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू आणि दिल्ली येथे आणले जाईल. त्यानंचर पुढच्या दिवशी अमेरिका, मध्यपूर्व देश, युरोप आणि दक्षिण पूर्व आशियामधील १३ देशातून दोन हजारांहून अधिक लोकांना मुंबई, कोची ,लखनौ आणि दिल्ली येथे आणले जाईल.  

दरम्यान, कोरोनाची लक्षणे दिसत नसलेल्याच लोकांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच नौदलाने आखाती देशात अडकलेल्या १० हजार भारतीयांना परत आणण्यासाठी  नौदलाकडून तीन युद्धनौका पाठवल्या जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAir Indiaएअर इंडिया