शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

coronavirus: परदेशात अडकलेल्या १४ हजार भारतीयांना ६४ विमानांमधून परत आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 17:03 IST

कोरोनामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक जवळपास बंद आहे. त्यामुळे नोकरीधंद्यानिमित्त परदेशात स्थायिक झालेले लाखो भारतीय नागरिक विदेशात अडकून पडले आहेत.

ठळक मुद्देपरदेशात अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहेयापैकी अनेक उड्डाणे एअर इंडियाच्या नेतृत्वात केली जातीलएका विमानात २०० ते ३०० प्रवाशांना बसण्याची परवानगी दिली जाणार आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण जगात आरोग्य आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक जवळपास बंद आहे. त्यामुळे नोकरीधंद्यानिमित्त परदेशात स्थायिक झालेले लाखो भारतीय नागरिक विदेशात अडकून पडले आहेत. दरम्यान, परदेशात अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पुढच्या आठवड्यात तब्बल ६४ विमानांमधून परदेशात अडकलेल्या १४ हजार ८०० भारतीयांना परत आणले जाणार आहे.

 या मोहिमेची सुरुवात बुधवारपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत अमेरिका, कुवेत, फिलिपिन्स, बांगलादेश, सौदी अरेबिया, मलेशिया आणि संयुत्च अरब अमिरातीसाठी विशेष उड्डाणे होणार आहेत. यापैकी अनेक उड्डाणे एअर इंडियाच्या नेतृत्वात केली जातील. तसेच एका विमानात २०० ते ३०० प्रवाशांना बसण्याची परवानगी दिली जाणार आहे.  

परदेशात अडकलेल्या लोकांना परत आणण्याच्या मोहिमेंतर्गत पहिल्या दिवशी १० विमानांमधून २ हजार ३०० लोकांना परत आणले जाईल. भारतातून निघालेली ही विमाने अमेरिका, फिलिपिन्स, सिंगापूर, बांगलादेश, यूएई, ब्रिटन, सौदी अरेबिया, कतार, ओमान, बहरीन आणि कुवेतसारख्या देशामधून लोकांना घेऊन येतील.  

महत्त्वाच्या बातम्या

बाळासाहेब, इंदिरा, पवार, लालूप्रसाद... राज ठाकरेंनी शेअर केली स्वतः काढलेली दुर्मिळ अर्कचित्रं

coronavirus: अजबच! या देशात माणसांसोबत बकरी आणि फळेही कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus: मुलीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांतच ती झाली कर्तव्यावर हजर

 

दुसऱ्या दिवशी सुमारे २ हजार ५० भारतीयांना नऊ विविध देशांमधून चेन्नई, कोची, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू आणि दिल्ली येथे आणले जाईल. त्यानंचर पुढच्या दिवशी अमेरिका, मध्यपूर्व देश, युरोप आणि दक्षिण पूर्व आशियामधील १३ देशातून दोन हजारांहून अधिक लोकांना मुंबई, कोची ,लखनौ आणि दिल्ली येथे आणले जाईल.  

दरम्यान, कोरोनाची लक्षणे दिसत नसलेल्याच लोकांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच नौदलाने आखाती देशात अडकलेल्या १० हजार भारतीयांना परत आणण्यासाठी  नौदलाकडून तीन युद्धनौका पाठवल्या जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAir Indiaएअर इंडिया