शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

coronavirus: परदेशात अडकलेल्या १४ हजार भारतीयांना ६४ विमानांमधून परत आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 17:03 IST

कोरोनामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक जवळपास बंद आहे. त्यामुळे नोकरीधंद्यानिमित्त परदेशात स्थायिक झालेले लाखो भारतीय नागरिक विदेशात अडकून पडले आहेत.

ठळक मुद्देपरदेशात अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहेयापैकी अनेक उड्डाणे एअर इंडियाच्या नेतृत्वात केली जातीलएका विमानात २०० ते ३०० प्रवाशांना बसण्याची परवानगी दिली जाणार आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण जगात आरोग्य आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक जवळपास बंद आहे. त्यामुळे नोकरीधंद्यानिमित्त परदेशात स्थायिक झालेले लाखो भारतीय नागरिक विदेशात अडकून पडले आहेत. दरम्यान, परदेशात अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पुढच्या आठवड्यात तब्बल ६४ विमानांमधून परदेशात अडकलेल्या १४ हजार ८०० भारतीयांना परत आणले जाणार आहे.

 या मोहिमेची सुरुवात बुधवारपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत अमेरिका, कुवेत, फिलिपिन्स, बांगलादेश, सौदी अरेबिया, मलेशिया आणि संयुत्च अरब अमिरातीसाठी विशेष उड्डाणे होणार आहेत. यापैकी अनेक उड्डाणे एअर इंडियाच्या नेतृत्वात केली जातील. तसेच एका विमानात २०० ते ३०० प्रवाशांना बसण्याची परवानगी दिली जाणार आहे.  

परदेशात अडकलेल्या लोकांना परत आणण्याच्या मोहिमेंतर्गत पहिल्या दिवशी १० विमानांमधून २ हजार ३०० लोकांना परत आणले जाईल. भारतातून निघालेली ही विमाने अमेरिका, फिलिपिन्स, सिंगापूर, बांगलादेश, यूएई, ब्रिटन, सौदी अरेबिया, कतार, ओमान, बहरीन आणि कुवेतसारख्या देशामधून लोकांना घेऊन येतील.  

महत्त्वाच्या बातम्या

बाळासाहेब, इंदिरा, पवार, लालूप्रसाद... राज ठाकरेंनी शेअर केली स्वतः काढलेली दुर्मिळ अर्कचित्रं

coronavirus: अजबच! या देशात माणसांसोबत बकरी आणि फळेही कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus: मुलीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांतच ती झाली कर्तव्यावर हजर

 

दुसऱ्या दिवशी सुमारे २ हजार ५० भारतीयांना नऊ विविध देशांमधून चेन्नई, कोची, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू आणि दिल्ली येथे आणले जाईल. त्यानंचर पुढच्या दिवशी अमेरिका, मध्यपूर्व देश, युरोप आणि दक्षिण पूर्व आशियामधील १३ देशातून दोन हजारांहून अधिक लोकांना मुंबई, कोची ,लखनौ आणि दिल्ली येथे आणले जाईल.  

दरम्यान, कोरोनाची लक्षणे दिसत नसलेल्याच लोकांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच नौदलाने आखाती देशात अडकलेल्या १० हजार भारतीयांना परत आणण्यासाठी  नौदलाकडून तीन युद्धनौका पाठवल्या जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAir Indiaएअर इंडिया