शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

 coronavaris : १ भाकरी देऊन १०० फोटोंना प्रसिद्धी, तथाकथित समाजसेवकांना विजेदरचा पंच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 9:17 AM

coronavaris : १ भाकरी देऊन १०० फोटोंना प्रसिद्धी, तथाकथित समाजसेवकांना विजेदरचा पंच 

मुंबई - कोरोना लॉकडाऊनच्या काळात समाजसेवक अन् मदतीनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येतंय. विशेष म्हणजे सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन स्वयंस्फूर्तीने हे समाजसेवक आपल्या दानशूर व्यक्तीत्वाचा बडेजावपणा सांगताना दिसत आहेत. एखाद्या गरिबाला थोडसं अन्न द्यायचं अन् १० जणांनी एकत्र येऊन फोटो काढायचा, जणू आता या गरिबाचा सगळा खर्च तेच करणार आहेत. विजेंदरने अशा समाजसेवा करणाऱ्यांना चांगलीच चपराक लगावली आहे. एका शायरीच्या माध्यमातून विजेंदरने अशा स्वयंस्फूर्ती समाजसेवकांवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर किराणा दुकाना आणि अत्यावश्यक सेवेच्या मालासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. मात्र, गरिब आणि मजदूर वर्गाची मोठी उपासमार या काळात होताना दिसून आली. या परिस्थितीत अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेत गरिबांना मदतीचा हात दिला. मात्र, या परिस्थितीत तोडकीशी मदत करत, फोटोसेशन आणि भंकपणाही होताना दिसून येत आहे. सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात हा दिखाऊपणा दिसून येतो. अनेकांनी केवळ पब्लिसिटी स्टंटसाठीच या मदतीचा उपयोग केला की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. नेहमीच आपले मत स्पष्टपणे मांडणाऱ्या बॉक्सर विजेंदर सिंगने शायरीतून यावर प्रकाश टाकलाय. विजेंदर सिंगच्या या शायरीवर काँग्रेस नेते माजी आमदार मुकेश शर्मा यांनीही समर्थनार्थ दोन ओळी लिहिल्या आहेत. 

ग़रीबी की क्या ख़ूब हँसी उड़ाई जा रही है,1 रोटी देकर 100 तस्वीर खिंचाई जा रही है ।

बॉक्सर विजेंदर सिंगने आपल्या ट्विटर अकाऊंटवरु विचार करण्यासारखा विचार मांडला आहे. हजारो युजर्संने विजेंदरचं हे ट्विट रिट्विट करत, हे म्हणणं अतिशय बरोबर असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, अनेकांनी हा भाजपा समर्थकांना टोला असल्याचे समजून विजेंदरलाही तूझं तूझं काम करावं, असा सल्ला दिलाय. पण, बहुतांश युजर्संना त्याचं हे ट्विट आवडल्याचं दिसून येतंय. 

तथाकथित नेता व समाज सेवक गरीबों को जलील करना बंद करें! असे  म्हणत मुकेश शर्मा यांनी विजेंदरने अगदी सत्य लिहिल्याचं म्हटलंय. 

‘लॉकडाऊन’चे बºयापैकी पालन होत असतानाच विविध राज्यांमधून हजारो स्थलांतरित कामगारांचे तांडे घराकडे परतत असल्याच्या बातम्यांनी देशभर गहजब झाला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून, या कठोर पावलामुळे जनतेला सोसाव्या लागलेल्या हालअपेष्टांबद्दल क्षमायाचना केली होती. काही दिवसांसाठी सर्वांना कळ सोसावीच लागेल, ‘लॉकडाऊन’ पाळला नाही, तर या धोक्यापासून देशाला वाचविणे कठीण होऊन बसेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVijender Singhविजेंदर सिंगSocial Mediaसोशल मीडिया