Corona Virus : कोरोना पुन्हा धडकी भरवणार? रोज 50 हजार केसेसची शक्यता; तज्ज्ञांनी सांगितला 'पीक टाईम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 10:39 IST2023-04-15T10:32:15+5:302023-04-15T10:39:28+5:30

Corona Virus : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली आणि मुंबईसह देशाच्या विविध भागात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.

Corona Virus india may month may seek peak everyday 50 thousand cases | Corona Virus : कोरोना पुन्हा धडकी भरवणार? रोज 50 हजार केसेसची शक्यता; तज्ज्ञांनी सांगितला 'पीक टाईम'

Corona Virus : कोरोना पुन्हा धडकी भरवणार? रोज 50 हजार केसेसची शक्यता; तज्ज्ञांनी सांगितला 'पीक टाईम'

भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली आणि मुंबईसह देशाच्या विविध भागात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, तज्ज्ञाचा अंदाज समोर आला असून तो धक्कादायक आहे. यानुसार, मे महिन्याच्या मध्यात कोरोना भारतात आपल्या शिखरावर असेल. याशिवाय दररोज 50 हजारांहून अधिक केसेस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हे भाकीत इतर कोणी नसून आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मणिंद्र अग्रवाल यांनी केले आहे, ज्यांनी गेल्या तीन वर्षांपासून अचूक आकडेवारी दिली आहे. प्रोफेसर मणिंद्र गणितीय मॉडेलच्या आधारे कोरोनाचे भाकीत करतात. प्रोफेसर अग्रवाल यांनी आज तकशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. प्रोफेसर मणिंद्र यांनी गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या वाढत्या केसेसच्या आधारे अभ्यास केला आहे. या अभ्यासाच्या आधारे त्यांनी मे महिन्यात भारतात कोरोनाचा कहर होण्याची भीती व्यक्त केली आहे. अंदाजानुसार या काळात दररोज 50 ते 60 हजार केसेस येऊ शकतात.

नॅचरल इम्युनिटी होतेय कमी

देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये एवढी मोठी वाढ होण्याचे कारण काय असेल? प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनीही याचे कारण सांगितले आहे. त्यांच्या मते, लोकांमधील नॅचरल इम्युनिटी कमी होणे हे यामागील कारण आहे. वास्तविक, जेव्हा संसर्ग होतो तेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. पण आता लोकांच्या शरीरातील ही क्षमता पाच टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याच वेळी, नवीन कोरोना प्रकार देखील पूर्वीपेक्षा वेगाने पसरत आहे. ही दोन कारणे कोरोनाच्या वाढत्या वाढीमागील प्रमुख कारणे आहेत.

मृत्यूची, रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी 

एकीकडे कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची बाब चिंताजनक आहे, तर दुसरीकडे दिलासा देणारी बाबही आहे. यानुसार, कोरोनाची प्रकरणे खूप वाढू शकतात, परंतु त्या मार्गाने ते घातक ठरणार नाही. प्रोफेसर अग्रवाल यांच्या मते याबाबत फार काळजी करण्याची गरज नाही. कोरोनाची प्रकरणे खूप वाढू शकतात, परंतु लोकांसाठी ते फारसे घातक ठरणार नाही. याशिवाय मृत्यूची संख्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही कमी राहील. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Corona Virus india may month may seek peak everyday 50 thousand cases