शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: देशातील १० कोटी जनतेने वाढवली सरकारची चिंता; ICMR चे धोक्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 15:11 IST

भारतात आतापर्यंत ९९.१९ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशातील ७० कोटी जनतेला कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे

ठळक मुद्देमागील २४ तासांत देशात कोरोनाचे १४ हजार ६२३ रुग्ण आढळले तर १९७ रुग्णांचा मृत्यू झालादेशात २८ कोटीहून अधिक लोकांचे पूर्ण लसीकरण झालं आहे.वैज्ञानिकांनी बूस्टर डोसची गरज आहे की नाही हे निश्चित करावं.

नवी दिल्ली – कोरोनामुळे सगळ्या देशासमोर संकट उभं राहिलं आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीनं अनेकांचा जीव घेतला आहे. सध्या कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केवळ लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. यात भारत एकीकडे १०० कोटी लसीचे डोस देण्याचं लक्ष्य गाठत असताना दुसरीकडे कोरोना व्हॅक्सिनेशनबाबत (Corona Vaccination in India) मोठी समस्या पुढे आल्यानं सरकारचं टेन्शन वाढलं आहे.

देशात १० कोटी लोक असे आहेत ज्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. परंतु दुसरा डोस घेण्यासाठी आलेच नाहीत. नीती आयोगाचे सदस्य व्हि. के पॉल यांनी दुसरा डोस घेणाऱ्यांचे कमी प्रमाण पाहता चिंता व्यक्त केली आहे. लोकांनी पुढे येऊन दुसरा डोस घ्यावा असं आवाहनही त्यांनी केले आहे. देशात आजही १० कोटी लोक असे आहेत ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला परंतु दुसरा डोस घेण्यासाठी पुढे आलेच नाहीत असं व्हि. के पॉल यांनी सांगितले.

दोन्ही डोसनं चांगली इम्युनिटी मिळते

पॉलने सांगितले की, व्हॅक्सिनच्या एका डोसनं कोरोनाविरुद्ध तात्पुरतं इम्युनिटी मिळते. तर दोन्ही डोस घेतल्यानंतर चांगली इम्युनिटी मिळते. तर बूस्टर डोसच्या आवश्यकतेवर पॉल यांनी स्पष्टपणे बोलले. वैज्ञानिकांनी बूस्टर डोसची गरज आहे की नाही हे निश्चित करावं. अमेरिकेसह काही देशांमध्ये बूस्टर डोसला मंजुरी देण्यात आली आहे.

भारतात १०० कोटींपर्यंत लसीकरण

भारतात आतापर्यंत ९९.१९ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशातील ७० कोटी जनतेला कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर २८ कोटीहून अधिक लोकांचे पूर्ण लसीकरण झालं आहे. हा आकडा अनेक देशाच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. भारतात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

भारतासाठी दिलासादायक चित्र

मागील २४ तासांत देशात कोरोनाचे १४ हजार ६२३ रुग्ण आढळले तर १९७ रुग्णांचा मृत्यू झाला. १९ हजार ४४६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले. आतापर्यंत ३ कोटी ४१ लाख रुग्ण समोर आले होते. त्यात सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ७८ हजार ९८ इतकी आहे. देशात ४.५२ लाख लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. देशात कोरोनाचे आर मूल्य देखील १ पेक्षा कमी आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या