शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

राजधानीत कोरोनाचा हाहाकार, देशातील प्रत्येक पाचवा मृत्यू दिल्लीत, अशी आहे देशाची स्थिती

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 22, 2020 6:34 PM

सध्या दिल्लीत मृतांच्या आकड्यावरून सर्वाधिक चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील 20 टक्के मृत्यू एकट्या दिल्लीत होत आहेत. 21 नोव्हेंबरला दिल्लीत तब्बल 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

ठळक मुद्देगेल्या 6 दिवसांत येथे सरासरी 100 लोकांचा मृत्यू होत आहे. देशातील 20 टक्के मृत्यू एकट्या दिल्लीत होत आहेत. 21 नोव्हेंबरला दिल्लीत तब्बल 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

नवी दिल्ली - कोरोनामुळे पुन्हा एकदा परिस्थिती बिघडायला सुरुवात झाली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर सर्वाधिक पहायला मिळत आहे. येथे देशातील एकूण कोरोना मृत्यूंपैकी 20 टक्के मृत्यू नोंदवले जात आहेत. एवढेच नाही, तर काही फॅक्ट्स आणि नवा रिपोर्ट भविष्यातील भयावह परिस्थितीचा सायरण वाजवत आहे. गेल्या 6 दिवसांत येथे सरासरी 100 लोकांचा मृत्यू होत आहे. 

सध्या दिल्लीत मृतांच्या आकड्यावरून सर्वाधिक चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील 20 टक्के मृत्यू एकट्या दिल्लीत होत आहेत. 21 नोव्हेंबरला दिल्लीत तब्बल 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर देशभरात 501 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रमाणे विचार केल्यास, कोरोनामुळे देशात प्रत्येक पाचवा मृत्यू दिल्लीत होत आहे. तर प्रत्येक 10वा रुग्ण दिल्लीतून आहे. आतापर्यंत दिल्लीत 8 हजार 270 जणांचा कोरोनाने बळी घेतला. गेल्या 24 तासांत येथे 45 हजारहून अधिक टेस्ट करण्यात आल्या आहेत. यांपैकी 5879 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अर्थात प्रत्येक 100 पैकी 13 लोक कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. सध्या दिल्लीत करोनाचे 39 हजार 741 रुग्ण सक्रिय आहेत. 

गेल्या 6 दिवसांतील दिल्लीतील मृतांचा आकडा - 21 नोव्हेंबर-111 20 नोव्हेंबर- 11819 नोव्हेंबर- 9818 नोव्हेंबर-131 17 नोव्हेंबर- 9916 नोव्हेंबर-99

आयएलबीएस डायरेक्टर डॉक्टर एसके सरीन म्हणाले, मास्कवर 2000 रुपयांचा दंड म्हणजे काही दंड नाही. ही सायंस समजावण्याची पद्धत आहे, जे लोकांनी ऐकले नाही. प्रॉपर मास्क लावणे अत्यंत आवश्यक आहे. खोकलल्याने, शिंकल्याने आणि मोठ्याने हसल्याने व्हायरस पसरतो. म्हणून मास्क वापरणे अत्यंत आवश्यक आहे. 

जसलोक रुग्णालयाचे डॉक्टर राजेश पारिख म्हणाले, ही तिसरी लाट आहे, असे मला वाटत नाही. सध्या ही पहिलीच लाट आहे. जेव्हा पहिल्या लाटेत कोरोना रुग्ण आढळणे पूर्णपणे बंद होईल, तेव्हाच दुसरी लाट अथवा तिसरी लाट म्हणता येईल. राहिला प्रश्न कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा, तर फेस्टिव्ह सीझनमध्ये आपण सावधगिरी बाळगायला हवी होती. मात्र, येथेच चूक झाली.

कशी आहे देशाची स्थिती -देशभरात गेल्या 24 तासांत तब्बल 45209 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. यामुळे आता देशातील कोरोना संक्रमितांचा एकूण आकडा 9095806वर गेला आहे. तर गेल्या 24 तासांत 501 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 133227 जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टर