शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

रेल्वे अपघाताला २ आठवडे उलटूनही चालक घरी परतला नाही; कुटुंबीय पाहतायत वाट...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 2:26 PM

Odisha Train Accident : ओडिशात झालेल्या रेल्वे अपघातानं अवघ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं.

Odisha Tragedy : ओडिशात झालेल्या रेल्वेअपघातानं अवघ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं. २९० नागरिकांना या भीषण अपघातात आपला जीव गमवावा लागला. या अपघातातील पीडितांच्या मदतीसाठी अनेकजण समोर येत आहेत. पण हा भीषण अपघात झालाच कसा? हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे. अशातच अपघात स्थळापासून सुमारे १५० किमी अंतरावर कटक जिल्ह्यातील नाहरपाडा गावात एक कुटुंब आपल्या मुलाची आतुरतेने वाट पाहत आहे.

खरं तर कोरोमंडल एक्स्प्रेसचे चालक गुणनिधी मोहंती यांचे हे गाव आहे. लक्षणीय बाब म्हणजे अपघाताला बराच काळ उलटला असला तरी मोहंती अद्याप घरी पोहचले नसल्याचे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे. हिंदुस्तान टाइम्सने गुणनिधी यांचे वडील ८० वर्षीय बिष्णू चरण मोहंती यांच्या हवाल्याने सांगितले की, अपघातानंतर ते त्यांच्या मुलाशी बोलले देखील नाहीत. ते आपला मुलगा घरी येण्याची वाट पाहत आहेत. या दुर्घटनेला गावकरी त्यांच्या मुलाला जबाबदार मानतात, पण त्या संध्याकाळी काय घडले ते कसे सांगायचे?, असेही मोहंती यांच्या वडिलांनी सांगितले.

२ जून रोजी खरगपूरहून भुवनेश्वरला जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस ओडिशातील बालासोर येथील बहंगा बाजार स्टेशनच्या इथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. अपघातानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचा काही भाग रुळावरून घसरून दुसऱ्या मार्गावर पडला. अपघाताच्या वेळी गुणनिधी मोहंती कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये लोको पायलट होते.

२९० जण दगावले२ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता बालासोर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला. या अपघातात २९० जणांचा मृत्यू झाला तर १२०० हून अधिक जण जखमी झाले होते. अवघ्या विश्वाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या रेल्वे अपघातात तब्बल २९० जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या दुर्देवी घटनेनंतर ३ जून रोजी ओडिशात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.  

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातrailwayरेल्वेAccidentअपघातOdishaओदिशा