शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

२४ तास बाजारपेठा सुरू ठेवू; जाहीरनाम्यात ‘आप’चे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 06:19 IST

सर्वोत्कृष्ट शिक्षण देणार; जगातील सर्वोकृ ष्ट शहर बनविण्याचा निर्धार

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने मंगळवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, त्यात दिल्लीत सर्वोत्कृष्ट शिक्षण, स्वच्छ पाणी, २४ तास वीज पुरवठा करण्याची आश्वासने आणि प्रायोगिक तत्त्वावर बाजारपेठा २४ तास सुरू ठेवण्याचा शब्द दिला आहे.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी २८ योजनांचे गॅरंटी कार्ड नावाने तो जाहीर केला. प्रत्येक घराला रेशन, १० लाख ज्येष्ठांना मोफत तीर्थयात्रा, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू कामावर असताना झाल्यास कुटुंबाला एक कोटींची भरपाई, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा या घोषणाही त्यात आहेत. युवकांसाठी स्पोकन इंग्लिश क्लास प्रोत्साहन व हॅपीनेस क्लास अंतर्गत देशभक्तीचा अभ्यासक्रमात समावेश केला जाणार आहे. जगातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे उभारण्यावर भर दिला जाईल, असेही सिसोदिया म्हणाले.

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी तीन दिवस शिल्लक असताना आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला आव्हान दिले आहे की, त्यांनी बुधवारपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा. या उमेदवारासोबत आपण जाहीरपणे चर्चा करण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

केजरीवाल म्हणाले की, जर भाजपने असे केले नाही तर आपले पुढचे पाऊल काय असेल याबाबत आपण मीडियाशी संवाद साधू. दिल्लीकरांची इच्छा आहे की, भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा. केजरीवाल म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर न करता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकांकडून कोºया चेकची मागणी करीत आहेत. ते लोकांना सांगत आहेत की, आपण नंतर चेकवर मुख्यमंत्रीपदाचे नाव लिहू. लोकशाहीत मुख्यमंत्री लोकांकडून निवडला जातो, अमित शहांकडून नाही, असेही केजरीवाल म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राष्ट्रवादावर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात राष्ट्रवादाच्या मुद्यावर भर दिला असून राष्ट्रविरोधी राजकारण करणाऱ्यांची ८ रोजी सुटी करा असे आवाहन त्यांनी केले. दिल्लीतील दुसºया सभेत त्यांनी ना शाहीनबागचा उल्लेख केला ना तुकडे तुकडे गँगचा.एअर स्ट्राइक, सीएए आणि कलम ३७० या मुद्यांवर त्यांचा भर होता. दिल्लीतील जनतेला मीठाचा हवाला देत ते म्हणाले की, मी दिल्लीचे मीठ खाल्ले आहे.येथील विकास करुन दाखवेन. व्दारका येथील डीडीए ग्राउंडवर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, हे लोक बाटला हाउसच्या अतिरेक्यांसाठी रडू शकतात. मात्र, ते दिल्लीचा विकास करु शकत नाहीत.

बेरोजगारी योगायोग की पंतप्रधानांचा प्रयोग -प्रियांका गांधी

देशभरात घटलेला रोजगार वाढती बेरोजगारी हा योगायोग आहे की पंतप्रधानांचा प्रयोग? असा प्रश्न करताना काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. संगम विहार येथे निवडणूक प्रचार सभेत त्या बोलत होत्या. काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष व माजी खासदार कीर्ती आझाद यांच्या पत्नी पूनम आझाद या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आहेत.

प्रियंका गांधी यांनी पहिल्यांदाच या निवडणुकीच्या काळात प्रचार सभेत जाहीर भाषण केले. काँग्रेससाठी प्रचार सत्तेत येण्याआधी नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, देशात बेरोजगारांमध्येच मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात साडेतीन कोटी युवकांचा रोजगार गेला. हा योगायोग आहे की, मोदींचा प्रयोग आहे, असा सवाल त्यांनी केला. वाढती बेरोजगारी हा केवळ योगायोग नसून यामागे भाजपचा हात असल्याचा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला. भाजपच्या धोरणांना कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याला देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला जातो, असेही त्या म्हणाल्या.मोदी-केजरीवाल भांडणात विकास रखडला -राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भांडणात दिल्लीचा विकास रखडला असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. जंगपुरा या भागात जाहीर सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली.

मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात दिल्लीचा विकास झाला होता. गेल्या पाच वर्षांपासून मोदी व केजरीवाल मार्केटिंगचा फंडा वापरत आहेत. जंगपुरा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार तलविंदर सिंग मारवा यांच्याबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले. तरविंदर सिंग मारवा यांनी पाकमध्ये जाऊन हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. त्यांना पाकच्या कारागृहात राहावे लागले होते. भाजपचे नेते देशात संरक्षणात हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात; काँग्रेसचे उमेदवार पाकमध्ये जाऊन हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात. ही हिंमत भाजपच्या नेत्यांमध्ये आहे काय? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूकcongressकाँग्रेसAAPआपRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी