शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

उत्तर प्रदेशात काँग्रेसचे दमदार उमेदवार; सपा-बसपाचे टेन्शन वाढवणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 09:52 IST

काँग्रेसने काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसने दमदार उमेदवार दिल्याने या ठिकाणी चुरशीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लखनौ - सपा-बसपाने केलेल्या महाआघाडीत स्थान न मिळाल्याने काँग्रेसनेउत्तर प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. प्रियंका गांधी यांना पक्षात महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आल्यानंतर काँग्रेसनेउत्तर प्रदेशात जोरदार प्रचार मोहीमही हाती घेतली आहे. दरम्यान, राज्यातील काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसने दमदार उमेदवार दिल्याने या ठिकाणी चुरशीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच काँग्रेसच्या उमेदवारांमुळे सपा-आणि बसपाचे टेन्शन वाढले असून, महाआघाडी आणि कांग्रेसमध्ये होणाऱ्या मतविभागणीमुळे काही मतदारसंघात सहज विजय मिळेल, अशी आशा भाजपाच्या मनात निर्माण झाली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशाता काँग्रेसची दाणादाण उडाली होती. मात्र त्याही परिस्थितीत गाझियाबाद, सहारनपूर, लखनौ, कानपूर, बाराबंकी आणि कुशीनगर येथे काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढती रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच काही ठिकाणी बीएसपीचे उमेदवार कमकुवत भासत आहेत, अशा परिस्थितीत महाआघाडीला मत द्यायचे की काँग्रेसला असा भ्रम  मतदारांच्या मनात निर्माण होऊ शकतो. तसेच काही शहरी मतदारसंघांमध्ये भाजपाविरोधात काँग्रेसच मुख्य प्रतिस्पर्धी आहे. अशा ठिकाणी सपा बसपाकडे दमदार नेते नाहीत, तिथेही काँग्रेसविरुद्ध भाजपा अशीच लढत रंगू शकते.   मतदारसंघांचा विचार केल्यास काँग्रेसने सहारनपूर येथून इम्रान मसूद यांना तिकीट दिले आहे. भाजपाविरोधात घणाघाती वक्तव्ये करणाऱ्या मसूद यांची मुस्लिम मतदारांवर चांगली पकड आहे. त्यामुळे ते सपा-बसपाच्या व्होट बँकेला सुरुंग लावू शकतात. अशा परिस्थितीत भाजपा उमेदवार राघव लखनपाल यांना मतविभागणीचा फायदा मिळू शकतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांना आता मुरादाबादऐवजी फतेहपूर सिक्री येथून उमेदवारी देण्यात आली आहे. येथे एकदा त्यांचा निसटत्या फरकाने पराभव झाला होता. मात्र यावेळी त्यांचा दावा मजबूत दिसत आहेत. इथेही तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. तसेच इथेही काँग्रेस आणि सपा-बसपा आघाडीत मतविभागणी होण्याचा धोका आहे.  माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांना फार्रुखाबाद मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.  तिथेही मुस्लिम मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी होण्याची शक्यता आहे. तर अलीगड येथे बसपाने दिलेले उमेदवार अजित बालयान हे बाहेरचे आहेत, मात्र ते मोठ्या प्रमाणावर मतविभागणी घडवून आणू शकतात. काँग्रेसने इथे बृजेंदर सिंह यांना ऊमेदवारी दिली आहे. त्यांना मुस्लिम मतदारांचा चांगला पाठिंबा आहे.  गाझियाबाद येथे काँग्रेसला बऱ्यापैकी समर्थन प्राप्त आहे. मात्र 2014 साली भाजपा उमेदवार जनरल व्ही. के. सिंह यांनी काँग्रेस उमेदवार राज बब्बर यांचा दारुण पराभव केला होता. यावेळी  काँग्रेसने गाझियाबाद येथून डॉली शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.  समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बाराबंकी येथे 2009 मध्ये पी. एल. पुनिया यांनी विजय मिळवला होता. तर 2014 मध्ये भाजपाच्या प्रियंका रावत यांनी पुनिया यांचा पराभव केला होता. यावेळी पुनिया यांचे पुत्र तनुज यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. पण सपा-बसपा आघाडीला मतांचे गणित आपल्या बाजूने फिरण्याची आशा आहे.  तर कानपूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. येथेही तिरंगी लढतीचा लाभ भाजपाला होऊ शकतो. तर कुशीनगरमध्ये काँग्रेसचे नेते आरपीएन सिंह यांचा भाजपासोबत थेट मुकाबला आहे. मात्र येथेही तिरंगी लढतीमुळे भाजपा फायदा होऊ शकतो.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश