शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन जग थक्क; मोदी सरकारचं प्रतीमा, ब्रँड बनवण्यावर लक्ष : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 11:46 IST

Coronavirus In India : सरकार सुरूवातीपासून कोरोनाचा सामना करण्यास आणि समजण्यास असमर्थ ठरल्याचे राहुल गांधी यांचं वक्तव्य

ठळक मुद्देसरकार सुरूवातीपासून कोरोनाचा सामना करण्यास आणि समजण्यास असमर्थ ठरल्याचे राहुल गांधी यांचं वक्तव्ययापूर्वी श्रेय घेतलं आता चेंडू राज्यांकडे टोलवला : राहुल गांधी

देशात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत देशात दररोज साडेतीन-चार लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद होताना दिसत आहे. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसंच यामुळे सपूर्ण जग चिंतीत झालं असल्याचं त्यांनी म्हटलं. "ज्यावेळी देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसत होता त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले ही लढाई जिंकण्याचं श्रेय घेतलं. आता त्यांनी तो चेंडू राज्यांकडे टोलवला," असा आरोप त्यांनी यावेळी केला. "आत्मनिर्भर बनवण्याचा उद्देश आहे. तुमच्या मदतीसाठी कोणीही येणार नाही. पंतप्रधानही येणार नाहीत. सरकारसाठी कोरोनाची स्थिती ही पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे आणि आश्चर्य व्यक्त केलं जात आहे की राज्य आणि नागरिकाना आत्मनिर्भर करण्याची त्यांची ही पद्धत आहे," असं राहुल गांधी म्हणाले. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकार असमर्थ ठरलं. वैज्ञानिकांनी वेळोवेळी इशाराही दिला होता. भारत हा जगातील पहिला असा देश आहे जो तज्ज्ञांनी कोरोना विषाणूसोबत लढण्याच्या दिलेल्या सल्ल्याशिवाय या महासाथीचा सामना करत आहे. तज्ज्ञ किंवा विशेषाधिकार असलेल्या संस्थांना विषाणूचा सामना करणं आणि गरजांनुसार निर्णय घेण्याचा अधिकार, योजना तयार करण्याचा अधिकार असतो. जेणेकरून लोकांचं जिवन वाचवण्यासाठी त्वरित पावलं उचलायला हवी," असंही ते म्हणाले.निवडणुकीत व्यस्त"ते कायमच निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होता. त्यांनी विषाणूचा प्रादुर्भाव वाढवणाऱ्या कार्यक्रमांना प्रोत्साहन दिलं. गेल्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्री सार्वजनिक ठिकाणीही विना मास्क दिसले होते. ते कोणत्या प्रकारचा संदेश देत आहेत?," असंही राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी लसींच्या किंमतीवरूनही पंतप्रधानांवर आरोप केला. उत्पादकांनी पहिले किंमत निश्चित केली आणि त्यानंतर ती कमी केली. एक प्रकारचा शो बवला आहे. सद्यस्थितीसाठी पंतप्रधान जबाबदार आहेत. ते व्यक्तीगत सरकारी व्यवस्था चालवतात. त्यांचं संपूर्ण लक्ष ब्रँडिंगवर आणि केवळ प्रतीमा चमकावण्यावर असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा