शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन जग थक्क; मोदी सरकारचं प्रतीमा, ब्रँड बनवण्यावर लक्ष : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 11:46 IST

Coronavirus In India : सरकार सुरूवातीपासून कोरोनाचा सामना करण्यास आणि समजण्यास असमर्थ ठरल्याचे राहुल गांधी यांचं वक्तव्य

ठळक मुद्देसरकार सुरूवातीपासून कोरोनाचा सामना करण्यास आणि समजण्यास असमर्थ ठरल्याचे राहुल गांधी यांचं वक्तव्ययापूर्वी श्रेय घेतलं आता चेंडू राज्यांकडे टोलवला : राहुल गांधी

देशात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत देशात दररोज साडेतीन-चार लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद होताना दिसत आहे. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसंच यामुळे सपूर्ण जग चिंतीत झालं असल्याचं त्यांनी म्हटलं. "ज्यावेळी देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसत होता त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले ही लढाई जिंकण्याचं श्रेय घेतलं. आता त्यांनी तो चेंडू राज्यांकडे टोलवला," असा आरोप त्यांनी यावेळी केला. "आत्मनिर्भर बनवण्याचा उद्देश आहे. तुमच्या मदतीसाठी कोणीही येणार नाही. पंतप्रधानही येणार नाहीत. सरकारसाठी कोरोनाची स्थिती ही पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे आणि आश्चर्य व्यक्त केलं जात आहे की राज्य आणि नागरिकाना आत्मनिर्भर करण्याची त्यांची ही पद्धत आहे," असं राहुल गांधी म्हणाले. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकार असमर्थ ठरलं. वैज्ञानिकांनी वेळोवेळी इशाराही दिला होता. भारत हा जगातील पहिला असा देश आहे जो तज्ज्ञांनी कोरोना विषाणूसोबत लढण्याच्या दिलेल्या सल्ल्याशिवाय या महासाथीचा सामना करत आहे. तज्ज्ञ किंवा विशेषाधिकार असलेल्या संस्थांना विषाणूचा सामना करणं आणि गरजांनुसार निर्णय घेण्याचा अधिकार, योजना तयार करण्याचा अधिकार असतो. जेणेकरून लोकांचं जिवन वाचवण्यासाठी त्वरित पावलं उचलायला हवी," असंही ते म्हणाले.निवडणुकीत व्यस्त"ते कायमच निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होता. त्यांनी विषाणूचा प्रादुर्भाव वाढवणाऱ्या कार्यक्रमांना प्रोत्साहन दिलं. गेल्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्री सार्वजनिक ठिकाणीही विना मास्क दिसले होते. ते कोणत्या प्रकारचा संदेश देत आहेत?," असंही राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी लसींच्या किंमतीवरूनही पंतप्रधानांवर आरोप केला. उत्पादकांनी पहिले किंमत निश्चित केली आणि त्यानंतर ती कमी केली. एक प्रकारचा शो बवला आहे. सद्यस्थितीसाठी पंतप्रधान जबाबदार आहेत. ते व्यक्तीगत सरकारी व्यवस्था चालवतात. त्यांचं संपूर्ण लक्ष ब्रँडिंगवर आणि केवळ प्रतीमा चमकावण्यावर असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा