शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Jallianwala Bagh: “मी एका शहिदाचा मुलगा, काही झालं तरी अपमान सहन करणार नाही”; राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 17:46 IST

Jallianwala Bagh: या अभद्र क्रूरतेच्या आम्ही विरोधात आहोत, या शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला फटकारले आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही कालावधीपासून काँग्रेस सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि आमदार राहुल गांधी अनेकविध विषयांवरून पंतप्रधाननरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधताना दिसत आहेत. ब्रिटीश राजवटीच्या क्रूरतेचे प्रतिक असलेल्या जालियनवाला बागचे मोदी सरकारकडून नुतनीकरण करण्यात आले असून, राजकीय क्षेत्रासहीत इतिहास तज्ज्ञांकडून यावर टीका करण्यात येते आहे. या अभद्र क्रूरतेच्या आम्ही विरोधात आहोत, या शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला फटकारले आहे. (congress rahul gandhi criticised modi govt about jallianwala bagh renovation)

काय सांगता! देशभरात ३,६०० गावे ‘राम’नामावर, तर ३,३०९ गावांच्या नावांमध्ये कृष्णाचा उल्लेख

सुमारे १०० वर्षांपूर्वी ब्रिटिश राजवटीने घडवून आणलेले जालियनवाला बाग सामूहिक हत्याकांड इतिहासातील एक काळा अध्याय असल्याचे मानले जाते. नुतनीकरणाच्या माध्यमातून शहिदस्थळाला आधुनिक रंग फासण्याचा प्रयत्न केल्याची टीका सोशल मीडियातून व्यक्त होते. अनेकांनी यावरून मोदी सरकारवर सुनावले असून, राहुल गांधी यांनी एक ट्विट करत टीका केली आहे. 

वेगात वाढ व वेळेची बचत होणार! रेल्वे ८ हजार ट्रेनच्या वेळा बदलणार, IIT मुंबईची घेणार मदत

या अभद्र क्रूरतेच्या आम्ही विरोधात आहोत

ज्यांना हौतात्म्याचा अर्थ कळत नाही, तेच केवळ जालियनवाला बाग शहिदांचा अपमान करू शकतात. मी एका शहिदाचा मुलगा आहे. कोणत्याही किमतीत आणि काही झाले तरी शहिदांचा अपमान सहन करणार नाही. या अभद्र क्रूरतेच्या आम्ही विरोधात आहोत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. हे स्मारकांचे कॉर्पोरेटीकरण आहे. जिथे ही स्मारके आधुनिक संरचनांच्या रुपात संपुष्टात येतात आणि आपले वारसा मूल्य हरवतात, असे इतिहासकार एस इरफान हबीब यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी जालियनवाला बागेतील नव्या स्मारकाचे उद्घाटन केले. या घटना दाखवण्यासाठी ऑडिओ-व्हिडिओ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मॅपिंग आणि थ्रीडी चित्रणासोबत कला आणि मूर्तीकलांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच घटना समोर उभी करण्यासाठी साऊंड आणि लाईट शोची व्यवस्था करण्यात आली आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीJallianwala Bagh massacreजालियनवाला बाग हत्याकांडcongressकाँग्रेसBJPभाजपा