शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

काँग्रेसला धक्का की काँग्रेसचा धक्का?; तीन प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्यांनी खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 10:30 AM

तीन दिवसांमध्ये तीन राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिले, त्यामुळं काँग्रेसला धक्का दिला की काँग्रेसला धक्का?

नवी दिल्ली - गेल्या तीन दिवसांत तीन राज्यांतील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले  आहे. रविवारी 17 तारखेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या महाधिवेशनामध्ये पूर्वापार चालत आलेली पक्षातील संस्कृती मोडीत काढण्याचा नारा दिला होता. त्यानंतर तीन दिवसांमध्ये तीन राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळं काँग्रेसला धक्का दिला की काँग्रेसने त्यांना धक्का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली नव्या टीमच्या लाँचिंगसाठी मार्ग मोकळा केला जातोय का?  

2012 च्या निवडणूकीच्या तुलनेत 2018मध्ये झालेल्या गुजरात निवडणूकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. पक्षाला चांगले यश मिळवून देण्यात प्रदेशाध्यक्षांचा सिंहाचा वाटा होता. तरीही सोमवारी भरतसिंह सोळंकी यांनी गुजरातच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काल गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक नाईक यांनीही राजीनामा दिला. हे राजीनामा सत्र गुजरात, गोवा त्यानंतर उत्तरप्रदेशमध्येही गेलं.  उत्तरप्रदेश राज्याच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राज बब्बर यांनी राजीनामा दिला आहे. उत्तरप्रदेश मधील नव्या चेहऱ्याला किंवा युवा काँग्रेस उमेदवाराला राज्याचे अध्यक्षपद मिळण्याची शक्याता आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, काल रात्री उशीरा राज बब्बर यांनी राजीनामा दिला आहे. राज बब्बरकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.  तर उत्तरप्रदेश काँग्रेसने यावर प्रतिक्रिया देणं टाळले. 

राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस वर्किंग कमिटीची नवी रचनाही अपेक्षित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नव्या वर्किंग कमिटीत 25 टक्के जागा 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्यांना दिल्या जाण्याची शक्यता आहे. वर्किंग कमिटीत 33 टक्के महिलांना स्थान मिळावं असाही प्रयत्न केला जाणार असल्याचे समजते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस