शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

काँग्रेसची सुरुवात NRIनं केली, नेहरू, गांधी आणि पटेल होते NRI - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 7:42 AM

काँग्रेसची सुरुवात अनिवासी भारतीयांनी केलेली आहे. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल सर्व अनिवासी भारतीय होते, असे विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केले आहे.

लंडन - 'काँग्रेसची सुरुवात अनिवासी भारतीयांनी केलेली आहे. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल हे सर्व अनिवासी भारतीय होते', असे विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केले आहे.  'या सर्वांनी आधी जग पाहिलं, जगभर घडणाऱ्या घडामोडी, चळवळी पाहिल्या आणि देशाला पुढे नेण्यासाठी योगदान दिले', असेही राहुल गांधींनी यावेळी म्हटले. लंडन येथे 'इंडियन ओव्हरसीज काँग्रेस'ला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलेले आहे. यावेळेस त्यांनी भाजपावर निशाणार साधला. 'क्रोध आणि द्वेष मिटवण्यासाठीची शक्ती काँग्रेसमध्ये आहे. देशाला अखंड ठेवण्यावर काँग्रेसचा भर आहे, असंही त्यांनी सांगितले.  

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्त्र सोडले. 'पंतप्रधान मोदी म्हणतात की, मी सत्तेत येण्यापूर्वी देशात काहीच झाले नव्हते. असे बोलून ते भारतीयांची खिल्ली उडवत आहेत. लालकिल्ल्यावरुन त्यांनी म्हटलं की, भारत झोपलेला हत्ती होता, मी त्याला जागं केले आहे. पंतप्रधान मोदींमध्ये किती अहंकार आहे, हे त्यांच्या विधानावरुन दिसून येते. देश केवळ एका व्यक्तीमुळे नाही, तर जनतेमुळे घडला आहे, हे त्यांना समजायला हवे', अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल चढवला. 

(वाचा :काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी नेमल्या तीन महत्त्वाच्या समित्या)

राहुल गांधी पुढे असंही म्हणाले की, गेल्या 70 वर्षात अगदी सर्व काही काँग्रेसने केलेले नाही. पण देशाचा जो काही विकास झालाय त्यात काँग्रेसचाही हातभार आहे. जनतेने हिंमत दाखवली आणि त्या हिमतीला आम्ही मार्ग दाखवला, व देशाला पुढे आणण्यासाठी त्यात भागीदार झालो. काँग्रेस देशाला जोडण्याचं काम करते. पण भाजपाने सत्तेत आल्यानंतर सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि आरबीआयला कमकुवत करण्याचे काम केले आहे, असा घणाघातही त्यांनी केला. 

''लोकांना सांगा... भारताला बदललं जात आहे, एकत्ररित्या पुढे जाण्याची त्याची शक्ती तोडण्याचं काम सुरू आहे. जनतेमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधा'', असा सल्ला यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.  

 

 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू