शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

“मोदी सरकार देशाच्या संपत्तीवर दिवसाढवळ्या दरोडा घालतंय”; काँग्रेसचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 18:56 IST

नव्या राष्ट्रीय चलनीकरण धोरणावर टीका करत, मोदी सरकार देशाच्या संपत्तीवर दिवसाढवळ्या दरोडा घालत असल्याचा घणाघात काँग्रेसने केला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय चलनीकरण धोरणाबाबत चिदंबरम यांचे २० प्रश्नमोदी विरोधकांना सामोरे जात नाहीतचिदंबरम यांनी साधला केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून कोरोना परिस्थिती, लसीकरण, इंधनदरवाढ, बेरोजगारी, महागाई यांसारख्या अनेकविध मुद्द्यांवरून काँग्रेस सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहे. यातच आता मोदी सरकाच्या नव्या राष्ट्रीय चलनीकरण धोरणावर टीका करत, मोदी सरकार देशाच्या संपत्तीवर दिवसाढवळ्या दरोडा घालत असल्याचा घणाघात केला आहे. (congress p chidambaram criticised modi govt over national monetization pipeline policy)

“मोदी आणि योगी यांना मत देऊन मोठी चूक केली”; टिकैत यांनी व्यक्त केला संताप

राष्ट्रीय चलनीकरण धोरण यावर संसदेत कोणतीही चर्चा केली नाही. उलट संसदेचे अधिवेशन संपल्यावर हे धोरण जाहीर केलं. या धोरणाअतंर्गत मोठी पायाभूत सुविधांची कामे पुढील काही वर्षात केली जाणार असल्याचा दावा सरकार करत आहे. मात्र, हे अशक्य आहे. या धोरणाच्या उद्देशाबाबत मोदी सरकारने स्पष्टीकरण द्यावे, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

“...तोपर्यंत कोरोनाची तिसरी लाटही ओसरेल, पण…” सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावले

विरोधकांना सामोरे जात नाहीत

राष्ट्रीय चलनीकरण धोरणाची उद्दिष्ट्ये काय आहेत, या माध्यमातून ४ वर्षांत केवळ ६ लाख कोटींचा महसूल मिळवण्याचे लक्ष्य आहे का, यातील मालमत्ता, कंपन्या, प्रकल्प निवडताना नेमकी कोणती वर्गवारी निश्चित करण्यात आली होती, असे सुमारे २० प्रश्न पी. चिदंबरम यांनी यावेळी उपस्थित केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत चर्चा करत नाहीत. विरोधकांना सामोरं जात नाहीत. देशाचे नेतृत्व करत असताना पत्रकार परिषदेला सामोरे न जाणारे नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव नेते आहेत, अशी टीका चिदंबरम यांनी केली. 

TATA ला जमलं नाही ते Reliance ने केलं! ‘या’ कंपनीवरील अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण; पाहा, डिटेल्स

मोदी सरकार रोजगारासाठी हानीकारक

मोदी सरकार रोजगारासाठी हानीकारक आहे. कोणत्याही प्रकारच्या 'मित्रहीन' व्यवसायांना किंवा रोजगारा प्रोत्साहन किंवा मदत मोदी सरकार करत नाही. ज्यांच्याकडे नोकरी आहे तीही हिसकावून घेण्याचे काम केले जात आहे. देशवासियांकडून आत्मनिर्भरतेचे ढोंग त्यांना अपेक्षित आहे. जनहितार्थ जारी, असे ट्विट करत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

TATA चा धुमाकूळ! ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत नोंदवली ५३ टक्के वाढ; बड्या कंपन्यांना धोबीपछाड

दरम्यान, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रस्ते, रेल्वे, वीज आदी क्षेत्रांतील चलनीकरण होऊ घातलेले प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत. चालू स्थितीत असलेल्या या पायाभूत प्रकल्पांद्वारे ‘जास्तीतजास्त मूल्यप्राप्ती’ असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सरसकट जमिनीची विक्री यातून केली जाणार नाही. या सर्व मालमत्तांची मालकी सरकारकडे राहणार असून, त्या ठराविक कालावधीसाठी खासगी क्षेत्रामार्फत चालविल्या जातील आणि पुन्हा सरकारकडे येतील, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणP. Chidambaramपी. चिदंबरमCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीnirmala sitharamanनिर्मला सीतारामनcongressकाँग्रेसBJPभाजपाEconomyअर्थव्यवस्था