शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
6
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
7
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
8
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
9
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
10
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
11
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
12
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
13
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
14
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
15
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
16
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
17
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
18
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
19
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
20
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  

भाजप विजयी होऊनही काँग्रेस सशक्त; भाजपाच्या १६ जागा कमी; कॉंग्रेसला १९ जागांचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:40 IST

गुजरातच्या मतदारांनी भाजपला ९९ जागा देऊन सहाव्यांदा सत्तास्थानी बसवले असले तरी कॉंग्रेसलाही नाकारलेले नाही. उलट सशक्त विरोधी पक्षाच्या स्वरूपात नव्या विधानसभेत कॉंग्रेसला स्थान दिले आहे. मुख्य म्हणजे काँग्रेसतर्फे जे ८0 जण विजयी झाले, त्यापैकी बहुसंख्य नवे चेहरे आहेत. १९९८ नंतर भाजपा प्रथमच २०१७ मध्ये दोन अंकी संख्या घेऊन सत्तारोहण करीत आहे.

महेश खरे सुरत : गुजरातच्या मतदारांनी भाजपला ९९ जागा देऊन सहाव्यांदा सत्तास्थानी बसवले असले तरी कॉंग्रेसलाही नाकारलेले नाही. उलट सशक्त विरोधी पक्षाच्या स्वरूपात नव्या विधानसभेत कॉंग्रेसला स्थान दिले आहे. मुख्य म्हणजे काँग्रेसतर्फे जे ८0 जण विजयी झाले, त्यापैकी बहुसंख्य नवे चेहरे आहेत.१९९८ नंतर भाजपा प्रथमच २०१७ मध्ये दोन अंकी संख्या घेऊन सत्तारोहण करीत आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी १५०पेक्षाअधिकचे लक्ष्य ठेवून निवडणूक प्रचार चालवला होता. याबाबत शहा यांना विचारले असता, ते म्हणाले की, प्रचारादरम्यान कॉंग्रेस एवढ्या खालच्या पातळीवर जाईल, हेमाहीत नव्हते. राज्यात जातीयवादी राजकारण काँग्रेसने केले. परंतु जागरूक जनतेने तो यशस्वी होऊ दिला नाही. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभव स्वीकारताना सांगितले की, गुजराती जनतेने भाजपला धडा शिकवला आहे.सौराष्टÑमध्ये भाजपाला खूपच मोठा झटका बसला. इथे २०१२च्या निवडणुकीत भाजपला ३६ जागा मिळाल्या होत्या. यंदा केवळ २३ जागांवर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसला सौराष्टÑमध्ये १५ जागांचा फायदा झाला. तथापि, उर्वरित राज्यात या पक्षाला ४ अतिरिक्तजागा मिळाल्या.एक वर्षापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या प्रमाणे मतदारांनी कौल दिला होता तोच पॅटर्न विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवला. ग्रामीण भागाने कॉंग्रेसला तर शहरी भागाने भाजपला पसंती दिली. चार बड्या शहरांत भाजपला ४४ जागा मिळाल्या, तर कॉंग्रेसला ज्या १९ नवीन जागा मिळाल्या. त्यात १६ जागा ग्रामीण भागातील आहेत. काँग्रेस नेते अल्पेश ठाकूरने राधनपूरहून विजय मिळवला. ते म्हणाले की,आम्ही शहरांच्या बाबतीत चुकलो. त्या मतदारांना आमचे मुद्दे समजावून सांगू शकलो नाही.कमी मतदानाचा फायदा-तोटायंदा २०१२च्या तुलनेत मतदान कमी झाले असले तरी भाजपाने त्याचा परिणाम भाजपाने आपल्या व्होट बँकेवर होऊ दिला नाही. या पक्षाला मागील वेळी ४८ टक्के मते मिळाली होती. यावेळी ४९ टक्के मते मिळाली. कॉंग्रेसला २०१२मध्ये ३८ टक्के तर यावेळी मतांचा टक्का वाढून ४१ झाला. काँग्रेसला सहा निवडणुकांनंतर ४0 टक्क्यांहून अधिक मते मिळाली.दहा ठिकाणी विजयाचे अंतर २ हजारपेक्षा कमीनिवडणुकीत किमान १० जागी विजयी व पराभूत उमेदवारामध्ये २ हजारांचे अंतर आहे. कापरडा मतदारसंघात तर १७० मतांनी काँग्रेस उमेदवाराने विजय नोंदवला.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017congressकाँग्रेसBJPभाजपा