शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

भाजप विजयी होऊनही काँग्रेस सशक्त; भाजपाच्या १६ जागा कमी; कॉंग्रेसला १९ जागांचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:40 IST

गुजरातच्या मतदारांनी भाजपला ९९ जागा देऊन सहाव्यांदा सत्तास्थानी बसवले असले तरी कॉंग्रेसलाही नाकारलेले नाही. उलट सशक्त विरोधी पक्षाच्या स्वरूपात नव्या विधानसभेत कॉंग्रेसला स्थान दिले आहे. मुख्य म्हणजे काँग्रेसतर्फे जे ८0 जण विजयी झाले, त्यापैकी बहुसंख्य नवे चेहरे आहेत. १९९८ नंतर भाजपा प्रथमच २०१७ मध्ये दोन अंकी संख्या घेऊन सत्तारोहण करीत आहे.

महेश खरे सुरत : गुजरातच्या मतदारांनी भाजपला ९९ जागा देऊन सहाव्यांदा सत्तास्थानी बसवले असले तरी कॉंग्रेसलाही नाकारलेले नाही. उलट सशक्त विरोधी पक्षाच्या स्वरूपात नव्या विधानसभेत कॉंग्रेसला स्थान दिले आहे. मुख्य म्हणजे काँग्रेसतर्फे जे ८0 जण विजयी झाले, त्यापैकी बहुसंख्य नवे चेहरे आहेत.१९९८ नंतर भाजपा प्रथमच २०१७ मध्ये दोन अंकी संख्या घेऊन सत्तारोहण करीत आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी १५०पेक्षाअधिकचे लक्ष्य ठेवून निवडणूक प्रचार चालवला होता. याबाबत शहा यांना विचारले असता, ते म्हणाले की, प्रचारादरम्यान कॉंग्रेस एवढ्या खालच्या पातळीवर जाईल, हेमाहीत नव्हते. राज्यात जातीयवादी राजकारण काँग्रेसने केले. परंतु जागरूक जनतेने तो यशस्वी होऊ दिला नाही. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभव स्वीकारताना सांगितले की, गुजराती जनतेने भाजपला धडा शिकवला आहे.सौराष्टÑमध्ये भाजपाला खूपच मोठा झटका बसला. इथे २०१२च्या निवडणुकीत भाजपला ३६ जागा मिळाल्या होत्या. यंदा केवळ २३ जागांवर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसला सौराष्टÑमध्ये १५ जागांचा फायदा झाला. तथापि, उर्वरित राज्यात या पक्षाला ४ अतिरिक्तजागा मिळाल्या.एक वर्षापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या प्रमाणे मतदारांनी कौल दिला होता तोच पॅटर्न विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवला. ग्रामीण भागाने कॉंग्रेसला तर शहरी भागाने भाजपला पसंती दिली. चार बड्या शहरांत भाजपला ४४ जागा मिळाल्या, तर कॉंग्रेसला ज्या १९ नवीन जागा मिळाल्या. त्यात १६ जागा ग्रामीण भागातील आहेत. काँग्रेस नेते अल्पेश ठाकूरने राधनपूरहून विजय मिळवला. ते म्हणाले की,आम्ही शहरांच्या बाबतीत चुकलो. त्या मतदारांना आमचे मुद्दे समजावून सांगू शकलो नाही.कमी मतदानाचा फायदा-तोटायंदा २०१२च्या तुलनेत मतदान कमी झाले असले तरी भाजपाने त्याचा परिणाम भाजपाने आपल्या व्होट बँकेवर होऊ दिला नाही. या पक्षाला मागील वेळी ४८ टक्के मते मिळाली होती. यावेळी ४९ टक्के मते मिळाली. कॉंग्रेसला २०१२मध्ये ३८ टक्के तर यावेळी मतांचा टक्का वाढून ४१ झाला. काँग्रेसला सहा निवडणुकांनंतर ४0 टक्क्यांहून अधिक मते मिळाली.दहा ठिकाणी विजयाचे अंतर २ हजारपेक्षा कमीनिवडणुकीत किमान १० जागी विजयी व पराभूत उमेदवारामध्ये २ हजारांचे अंतर आहे. कापरडा मतदारसंघात तर १७० मतांनी काँग्रेस उमेदवाराने विजय नोंदवला.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017congressकाँग्रेसBJPभाजपा