शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भाजप विजयी होऊनही काँग्रेस सशक्त; भाजपाच्या १६ जागा कमी; कॉंग्रेसला १९ जागांचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:40 IST

गुजरातच्या मतदारांनी भाजपला ९९ जागा देऊन सहाव्यांदा सत्तास्थानी बसवले असले तरी कॉंग्रेसलाही नाकारलेले नाही. उलट सशक्त विरोधी पक्षाच्या स्वरूपात नव्या विधानसभेत कॉंग्रेसला स्थान दिले आहे. मुख्य म्हणजे काँग्रेसतर्फे जे ८0 जण विजयी झाले, त्यापैकी बहुसंख्य नवे चेहरे आहेत. १९९८ नंतर भाजपा प्रथमच २०१७ मध्ये दोन अंकी संख्या घेऊन सत्तारोहण करीत आहे.

महेश खरे सुरत : गुजरातच्या मतदारांनी भाजपला ९९ जागा देऊन सहाव्यांदा सत्तास्थानी बसवले असले तरी कॉंग्रेसलाही नाकारलेले नाही. उलट सशक्त विरोधी पक्षाच्या स्वरूपात नव्या विधानसभेत कॉंग्रेसला स्थान दिले आहे. मुख्य म्हणजे काँग्रेसतर्फे जे ८0 जण विजयी झाले, त्यापैकी बहुसंख्य नवे चेहरे आहेत.१९९८ नंतर भाजपा प्रथमच २०१७ मध्ये दोन अंकी संख्या घेऊन सत्तारोहण करीत आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी १५०पेक्षाअधिकचे लक्ष्य ठेवून निवडणूक प्रचार चालवला होता. याबाबत शहा यांना विचारले असता, ते म्हणाले की, प्रचारादरम्यान कॉंग्रेस एवढ्या खालच्या पातळीवर जाईल, हेमाहीत नव्हते. राज्यात जातीयवादी राजकारण काँग्रेसने केले. परंतु जागरूक जनतेने तो यशस्वी होऊ दिला नाही. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभव स्वीकारताना सांगितले की, गुजराती जनतेने भाजपला धडा शिकवला आहे.सौराष्टÑमध्ये भाजपाला खूपच मोठा झटका बसला. इथे २०१२च्या निवडणुकीत भाजपला ३६ जागा मिळाल्या होत्या. यंदा केवळ २३ जागांवर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसला सौराष्टÑमध्ये १५ जागांचा फायदा झाला. तथापि, उर्वरित राज्यात या पक्षाला ४ अतिरिक्तजागा मिळाल्या.एक वर्षापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या प्रमाणे मतदारांनी कौल दिला होता तोच पॅटर्न विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवला. ग्रामीण भागाने कॉंग्रेसला तर शहरी भागाने भाजपला पसंती दिली. चार बड्या शहरांत भाजपला ४४ जागा मिळाल्या, तर कॉंग्रेसला ज्या १९ नवीन जागा मिळाल्या. त्यात १६ जागा ग्रामीण भागातील आहेत. काँग्रेस नेते अल्पेश ठाकूरने राधनपूरहून विजय मिळवला. ते म्हणाले की,आम्ही शहरांच्या बाबतीत चुकलो. त्या मतदारांना आमचे मुद्दे समजावून सांगू शकलो नाही.कमी मतदानाचा फायदा-तोटायंदा २०१२च्या तुलनेत मतदान कमी झाले असले तरी भाजपाने त्याचा परिणाम भाजपाने आपल्या व्होट बँकेवर होऊ दिला नाही. या पक्षाला मागील वेळी ४८ टक्के मते मिळाली होती. यावेळी ४९ टक्के मते मिळाली. कॉंग्रेसला २०१२मध्ये ३८ टक्के तर यावेळी मतांचा टक्का वाढून ४१ झाला. काँग्रेसला सहा निवडणुकांनंतर ४0 टक्क्यांहून अधिक मते मिळाली.दहा ठिकाणी विजयाचे अंतर २ हजारपेक्षा कमीनिवडणुकीत किमान १० जागी विजयी व पराभूत उमेदवारामध्ये २ हजारांचे अंतर आहे. कापरडा मतदारसंघात तर १७० मतांनी काँग्रेस उमेदवाराने विजय नोंदवला.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017congressकाँग्रेसBJPभाजपा