शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 13:02 IST

Congress Mallikarjun Kharge And BJP : काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कंगना राणौतच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे.

भाजपा खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानामुळे देशातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कंगना राणौतच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. तसेच भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भाजपामध्ये शेतकरीविरोधी द्वेषाची मानसिकता असल्याचं साऱ्या देशाला कळून चुकलं आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "७५० शेतकऱ्यांच्या हौतात्म्यानंतरही शेतकरी विरोधी भाजपा आणि मोदी सरकारला त्यांचा गंभीर गुन्हा लक्षात आलेला नाही. तीन काळे शेतकरी विरोधी कायदे पुन्हा लागू करण्याची चर्चा आहे. याला काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे. शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने आमच्या अन्नदात्यांसाठी काटेरी तार, ड्रोन, अश्रुधुराचा वापर, खिळे आणि बंदुकांचा वापर केला हे भारतातील ६२ कोटी शेतकरी कधीही विसरणार नाहीत."

"मोदीजींच्या विधानांमुळे त्यांचे मंत्री, खासदार आणि प्रचार यंत्रणेला शेतकऱ्यांचा अपमान करण्याची सवय लागली आहे. १० वर्षात मोदी सरकारने देशातील अन्नदात्यांना दिलेली तीन आश्वासने तोडली आहेत. १ - २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट. २ - स्वामिनाथन अहवालानुसार इनपुट कॉस्ट + ५०% एमएसपीची अंमलबजावणी. ३ - MSP ला कायदेशीर दर्जा. शेतकरी आंदोलन मागे घेताना मोदीजींनी सरकारी समितीची घोषणा केली होती, ती अजूनही तशीच आहे."

"मोदी सरकार एमएसपीच्या कायदेशीर हमीच्या विरोधात आहे. शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत देण्यात आली नाही, त्यांच्या स्मरणार्थ संसदेत दोन मिनिटे मौन पाळणेही मोदी सरकारने योग्य मानले नाही आणि सतत त्यांचं चारित्र्यहनन सुरू आहे. भाजपामध्ये शेतकरीविरोधी द्वेषाची मानसिकता असल्याचं साऱ्या देशाला कळून चुकलं आहे" असं म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.  

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसKangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी