शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 13:02 IST

Congress Mallikarjun Kharge And BJP : काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कंगना राणौतच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे.

भाजपा खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानामुळे देशातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कंगना राणौतच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. तसेच भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भाजपामध्ये शेतकरीविरोधी द्वेषाची मानसिकता असल्याचं साऱ्या देशाला कळून चुकलं आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "७५० शेतकऱ्यांच्या हौतात्म्यानंतरही शेतकरी विरोधी भाजपा आणि मोदी सरकारला त्यांचा गंभीर गुन्हा लक्षात आलेला नाही. तीन काळे शेतकरी विरोधी कायदे पुन्हा लागू करण्याची चर्चा आहे. याला काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे. शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने आमच्या अन्नदात्यांसाठी काटेरी तार, ड्रोन, अश्रुधुराचा वापर, खिळे आणि बंदुकांचा वापर केला हे भारतातील ६२ कोटी शेतकरी कधीही विसरणार नाहीत."

"मोदीजींच्या विधानांमुळे त्यांचे मंत्री, खासदार आणि प्रचार यंत्रणेला शेतकऱ्यांचा अपमान करण्याची सवय लागली आहे. १० वर्षात मोदी सरकारने देशातील अन्नदात्यांना दिलेली तीन आश्वासने तोडली आहेत. १ - २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट. २ - स्वामिनाथन अहवालानुसार इनपुट कॉस्ट + ५०% एमएसपीची अंमलबजावणी. ३ - MSP ला कायदेशीर दर्जा. शेतकरी आंदोलन मागे घेताना मोदीजींनी सरकारी समितीची घोषणा केली होती, ती अजूनही तशीच आहे."

"मोदी सरकार एमएसपीच्या कायदेशीर हमीच्या विरोधात आहे. शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत देण्यात आली नाही, त्यांच्या स्मरणार्थ संसदेत दोन मिनिटे मौन पाळणेही मोदी सरकारने योग्य मानले नाही आणि सतत त्यांचं चारित्र्यहनन सुरू आहे. भाजपामध्ये शेतकरीविरोधी द्वेषाची मानसिकता असल्याचं साऱ्या देशाला कळून चुकलं आहे" असं म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.  

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसKangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी