शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी शिवसेनेला मुद्दाम डिवचलं का?; सोनियांसह कुणालाच समजेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 17:18 IST

राहुल गांधींच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात महत्त्वाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला का दुखावले, या कोड्यात पक्षाचे नेते व हंगामी अध्यक्ष व त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी, असे सगळेच पडले आहेत.येथील रामलीला मैदानावरील शनिवारच्या प्रचंड मोठ्या मेळाव्यात (भारत बचाओ रॅली) आपण काय बोलत आहोत याची पूर्ण जाणीव राहुल गांधी यांना होती. कारण, ते म्हणाले होते की, माझे नाव राहुल सावरकर नाही. माझे नाव राहुल गांधी असून, मी कधीही माफी मागणार नाही. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती; पण ते करणारा मी नाही. हे भगव्या रंगाचे झेंडे असणाऱ्या पक्षांना राहुल गांधी सांगत आहेत, हे तर उघडच आहे.राहुल गांधी यांच्यानंतर सोनिया गांधी बोलल्या. मेळाव्याचा जो उद्देश होता त्याचप्रमाणे गांधी बोलल्या व त्यांनी राहुल गांधी यांच्या त्या विधानांकडे दुर्लक्ष केले, ही बाब वेगळी. या मेळाव्यानंतर सोनिया गांधी या लगेचच परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्याशी बोलल्या, असे समजले. पडद्यामागे नंतर घडलेल्या घडामोडींमध्ये शिवसेनेचे संजय राऊत यांनी टिष्ट्वटरवर सावध प्रतिक्रिया दिली आणि या प्रकरणाची तीव्रता मंदावली.या महामेळाव्याला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्याबद्दल पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांची राहुल गांधी यांनी पाठ थोपटली. मेळाव्याबद्दल आम्हाला दाद न देता वासनिक यांचे कौतुक झाल्याबद्दल काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक ज्येष्ठ नेते नाराज आहेत.हा मेळावा यशस्वी केल्याबद्दल राहुल गांधी यांनी वासनिक यांना बोलावून घेऊन हजारो लोकांच्या उपस्थितीत त्यांची पाठ थोपटली. एवढा मोठा मेळावा यशस्वी केल्याबद्दल राहुल गांधी यांनी पक्षाच्या एकाही नेत्याचे नाव घेतले नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (राजस्थान), कमल नाथ (मध्यप्रदेश) आणि भूपेश बघेल (छत्तीसगड) या मुख्यमंत्र्यांनी व हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांनी आपापल्या राज्यांतून या मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी अनेक आठवडे काम केले होते. या उलट या मेळाव्याला उत्तर प्रदेशातून मोठ्या संख्येने आलेल्या आपल्या कार्यकर्त्यांचे पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी अभिनंदन केले. प्रियांका गांधी बोलत होत्या तेव्हा हे कार्यकर्ते त्यांना प्रोत्साहन देत होते.काय आहे खरे कारण?आतील गोटातून मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी सावरकरांचे नाव मुद्दामच घेतले, ते शिवसेनेला डिवचण्यासाठी. हा मेळावा भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) लक्ष्य करण्यासाठीच होता. राहुल गांधी यांनी त्या लक्ष्यापासून दूर होत शिवसेनेला डिवचले.राहुल गांधी यांच्या जवळच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना या आघाडीच्या बाजूने राहुल गांधी कधीच नव्हते; परंतु राजकीय अपरिहार्यतेमुळे सोनिया गांधी यांनी या आघाडीला मान्यता दिली. तरीही राहुल गांधी हे कधीही या आघाडीबद्दल समाधानी नव्हते आणि जेव्हा त्यांना मानहानिकारक भाष्य जाहीरपणे करण्याची संधी आली ती त्यांनी दवडली नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBJPभाजपा