शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

शेतकऱ्यांवर 'मित्रां'च्या कायद्याचा वार, हेच आहे मोदी सरकार; राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 3:50 PM

rahul gandhi : युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, जनतेवर महागाईचा अत्याचार म्हणत राहुल गांधींची सरकारवर टीका

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनाचा आज ३४ वा दिवसनोव्हेंबर महिन्यात बेरोजगारीच्या प्रमाणातही वाढ

देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. अशातच बरोजगारीचंही संकट देशासमोर उभं राहिलं आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात रोजगारात ०.९ टक्क्यांची घट झाली. त्यामुळे तब्बल ३५ लाख नोकऱ्यांवर संकट उभं राहिलं. यावरून आता काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ऑक्टोबर महिन्यातही रोजगारात ०.१ टक्क्यांची घट झाली होती."युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, जनतेवर महागाईचा अत्याचार. शेतकऱ्यांवर मित्रांच्या कायद्यांचा वार, हेच आहे मोदी सरकार," असं म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रावर हल्लाबोल केला. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आदोलनगेल्या ३३ दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा ३४ वा दिवस आहे. दरम्यान, हे शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी शेतकरी नेते आणि सरकारमध्ये ३० डिसेंबर रोजी चर्चा पार पडणार आहे. या चर्चेसाठी शेतकरी संघटनाही तयार असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी शेतकरी नेत्यांकडून ही चर्चा २९ डिसेंबर रोजी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु सोमवारी सरकारकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात ३० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता विज्ञान भवनात शेतकरी संघटनांना आमंत्रित करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. २६ नोव्हेंबरपासून ४० शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.बेरोजगारीत वाढऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात बरोजगारीचं प्रमाण वाढल्यानं चिंतेतही वाढ झाली आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात हा ट्रेंड कमी होईल अशी शक्यता सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीनं व्यक्त केली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीनं जाहीर केलेल्या अहलानुसार मागील महिन्यात ३९.९ कोटी लोकांकडे रोजगार गोता. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यात २.४ टक्क्यांची घट झाली आहे. बाजारातील चांगल्या रिकव्हरीनंतरही मार्च २०२० पासून रोजगारात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. कमी प्रमाणात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमुळे लोकं श्रम बाजारातून बाहेर पडू लागले असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसFarmer strikeशेतकरी संपNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्ली