शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मी शेतकऱ्यांना जाणतो, ते मागे हटणार नाहीत; सरकारलाच माघार घ्यावी लागेल : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 16:45 IST

सरकारकडून शेतकऱ्यांवर अत्याचार होत असल्याचा राहुल गांधींचा आरोप

ठळक मुद्देसरकारकडून शेतकऱ्यांवर अत्याचार होत असल्याचा राहुल गांधींचा आरोपशेतकऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडवणं सरकारचं काम, राहुल गांधींचं वक्तव्य

काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन, तसंच अर्थसंकल्पावर भाष्य करत सरकारवर टीकेचा बाण सोडला. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी यावर लवकरच तोडगा काढण्यात आला पाहिजे असं मत व्यक्त केलं. शेतकरी हा देशाचा कणा आहेत आणि सरकार त्यांच्यावर अत्याचार करत असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली. "शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तटबंदी तयार करण्यात आली आहे. हे शेतकऱ्यांना घाबरतात का?," असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला. "शेतकरी ही देशाची ताकद आहे. केंद्र सरकारचं काम शेतकऱ्यांशी चर्चा करणं आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करणं हे आहे. आज दिल्लीला शेतकऱ्यांचा वेढा आहे. का दिल्लीला आज तटबंदी घालण्यात येत आहे?," असंही ते म्हणाले.  "सरकार या समस्येचं निराकरण का करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ऑफर टेबलवर आहे. हा कायदा दोन वर्षांसाठी थांबवला जाऊ शकतो. या समस्येचं निराकरण केलं गेलं पाहिजे. मी  शेतकऱ्यांना चांगलं ओळखतो. ते मागे हटणार नाहीत, सरकारचा मागे हटावं लागेल," असंही राहुल गांधी यांनी नमूद केलं. शेतकऱ्यांना धमकावण्याचं काम"सरकार शेतकऱ्यांना घाबरवण्याचं, धमकावण्याचं काम हे सरकारचं नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्याचं निराकरण करणं हे त्यांचं काम आहे, सरकार शेतकऱ्यांशी चर्चा का करत नाही. ही समस्या आपल्या देशासाठी चांगली नाही. शेतकरी कुठेच जात नाहीत," असंही ते म्हणाले.अर्थसंकल्पावही टीका"हा अर्थसंकल्प देशाच्या एक टक्का इतक्या लोकसंख्येचा आहे. जनतेच्या हाती पैसा देण्याची गरज आहे. चीन बाबतही सरकारची भूमिका स्पष्ट नाही. चीन भारताची जमिन बळकावतो आणि तुम्ही अर्थसंकल्प वाढवणार नाही असा संदेश देता. आपण आपल्या लष्कराला सहकार्य करणार नाही का? ही कोणती देशभक्ती आहे? थंडीत लष्कर देशाच्या सीमेचं रक्षण करत आहे आणि तुम्ही त्यांना पैसेही देत नाही," असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसGovernmentसरकारFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीIndiaभारतchinaचीनbudget 2021बजेट 2021