शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
2
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
5
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
6
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
7
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
8
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
9
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
10
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
11
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
12
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
13
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
14
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
15
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
16
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
17
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
18
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
19
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
20
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका

मी शेतकऱ्यांना जाणतो, ते मागे हटणार नाहीत; सरकारलाच माघार घ्यावी लागेल : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 16:45 IST

सरकारकडून शेतकऱ्यांवर अत्याचार होत असल्याचा राहुल गांधींचा आरोप

ठळक मुद्देसरकारकडून शेतकऱ्यांवर अत्याचार होत असल्याचा राहुल गांधींचा आरोपशेतकऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडवणं सरकारचं काम, राहुल गांधींचं वक्तव्य

काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन, तसंच अर्थसंकल्पावर भाष्य करत सरकारवर टीकेचा बाण सोडला. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी यावर लवकरच तोडगा काढण्यात आला पाहिजे असं मत व्यक्त केलं. शेतकरी हा देशाचा कणा आहेत आणि सरकार त्यांच्यावर अत्याचार करत असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली. "शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तटबंदी तयार करण्यात आली आहे. हे शेतकऱ्यांना घाबरतात का?," असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला. "शेतकरी ही देशाची ताकद आहे. केंद्र सरकारचं काम शेतकऱ्यांशी चर्चा करणं आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करणं हे आहे. आज दिल्लीला शेतकऱ्यांचा वेढा आहे. का दिल्लीला आज तटबंदी घालण्यात येत आहे?," असंही ते म्हणाले.  "सरकार या समस्येचं निराकरण का करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ऑफर टेबलवर आहे. हा कायदा दोन वर्षांसाठी थांबवला जाऊ शकतो. या समस्येचं निराकरण केलं गेलं पाहिजे. मी  शेतकऱ्यांना चांगलं ओळखतो. ते मागे हटणार नाहीत, सरकारचा मागे हटावं लागेल," असंही राहुल गांधी यांनी नमूद केलं. शेतकऱ्यांना धमकावण्याचं काम"सरकार शेतकऱ्यांना घाबरवण्याचं, धमकावण्याचं काम हे सरकारचं नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्याचं निराकरण करणं हे त्यांचं काम आहे, सरकार शेतकऱ्यांशी चर्चा का करत नाही. ही समस्या आपल्या देशासाठी चांगली नाही. शेतकरी कुठेच जात नाहीत," असंही ते म्हणाले.अर्थसंकल्पावही टीका"हा अर्थसंकल्प देशाच्या एक टक्का इतक्या लोकसंख्येचा आहे. जनतेच्या हाती पैसा देण्याची गरज आहे. चीन बाबतही सरकारची भूमिका स्पष्ट नाही. चीन भारताची जमिन बळकावतो आणि तुम्ही अर्थसंकल्प वाढवणार नाही असा संदेश देता. आपण आपल्या लष्कराला सहकार्य करणार नाही का? ही कोणती देशभक्ती आहे? थंडीत लष्कर देशाच्या सीमेचं रक्षण करत आहे आणि तुम्ही त्यांना पैसेही देत नाही," असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसGovernmentसरकारFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीIndiaभारतchinaचीनbudget 2021बजेट 2021