शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
2
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
3
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
4
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
5
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
6
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
7
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
8
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
9
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
10
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
11
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
12
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
13
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
14
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
15
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
16
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
17
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
18
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
19
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
20
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
Daily Top 2Weekly Top 5

"भाजप लोकशाहीची हत्या..."; मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 01:20 IST

"हे सर्व केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर घडले. ही लोकशाहीची हत्या नाही तर काय...?"

गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (१३ फेब्रुवारी २०२५) मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. या निर्णयावरून, देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी म्हणाले, भाजप लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, गेल्या २० महिन्यांपासून काँग्रेस ज्याची मागणी करत होती ते अखेर घडले आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

प्रमोद तिवारी म्हणाले, "भाजप लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहे! मणिपूर सरकार अल्पमतात, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला! काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केली होती. तरीही विरोधी पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी का दिली गेली नाही? भाजप सरकार स्थापन करू शकत नव्हता.  यामुळे त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करून सत्तेवर कब्जा केला! हे सर्व केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर घडले. ही लोकशाहीची हत्या नाही तर काय आहे?"

'परिस्थिती संभाळण्यास गृह मंत्री अयशस्वी' -याशिवया, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, "भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गेल्या २० महिन्यांपासून ज्याची मागणी करत होती, तेच घडले. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सुप्रिम कोर्टाने राज्यात संवैधानिक यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाल्याचे म्हटल्यानंतर, हे घडले आहे. येथे ३ मे २०२३ पासून आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि ६०,००० हून अधिक पुरुष, महिला आणि मुले विस्थापित झाली आहेत. हे तेव्हा घडले, जेव्हा मणिपूरच्या सामाजिकतेवर गंभीर आघात झाला. हे तेव्हा घडले जेव्हा फेब्रुवारी 2022 मध्ये भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोठे बहुमत मिळाले. मात्र, त्यांच्या राजकारणाने केवळ १५ महिन्यांतच ही भयानक दुर्घटना घडली.

याशिवाय, असे तेव्हा घडले, जेव्हा केंद्रीय गृहमंत्री मणिपूरची स्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान मोदी यांनी ही जबाबदारी त्यांना सोपवली होती. एवढेच नाही, तर हे तेव्हा घढले आहे, जेव्हा जग भरात फिरणारे पंतप्रधान, मणिपूरला जाण्यास आणि तेथे समेटाची प्रक्रिया सुरू करण्यास सतत नकार देत आहेत," असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसBJPभाजपा