शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"भाजप लोकशाहीची हत्या..."; मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 01:20 IST

"हे सर्व केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर घडले. ही लोकशाहीची हत्या नाही तर काय...?"

गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (१३ फेब्रुवारी २०२५) मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. या निर्णयावरून, देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी म्हणाले, भाजप लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, गेल्या २० महिन्यांपासून काँग्रेस ज्याची मागणी करत होती ते अखेर घडले आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

प्रमोद तिवारी म्हणाले, "भाजप लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहे! मणिपूर सरकार अल्पमतात, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला! काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केली होती. तरीही विरोधी पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी का दिली गेली नाही? भाजप सरकार स्थापन करू शकत नव्हता.  यामुळे त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करून सत्तेवर कब्जा केला! हे सर्व केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर घडले. ही लोकशाहीची हत्या नाही तर काय आहे?"

'परिस्थिती संभाळण्यास गृह मंत्री अयशस्वी' -याशिवया, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, "भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गेल्या २० महिन्यांपासून ज्याची मागणी करत होती, तेच घडले. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सुप्रिम कोर्टाने राज्यात संवैधानिक यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाल्याचे म्हटल्यानंतर, हे घडले आहे. येथे ३ मे २०२३ पासून आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि ६०,००० हून अधिक पुरुष, महिला आणि मुले विस्थापित झाली आहेत. हे तेव्हा घडले, जेव्हा मणिपूरच्या सामाजिकतेवर गंभीर आघात झाला. हे तेव्हा घडले जेव्हा फेब्रुवारी 2022 मध्ये भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोठे बहुमत मिळाले. मात्र, त्यांच्या राजकारणाने केवळ १५ महिन्यांतच ही भयानक दुर्घटना घडली.

याशिवाय, असे तेव्हा घडले, जेव्हा केंद्रीय गृहमंत्री मणिपूरची स्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान मोदी यांनी ही जबाबदारी त्यांना सोपवली होती. एवढेच नाही, तर हे तेव्हा घढले आहे, जेव्हा जग भरात फिरणारे पंतप्रधान, मणिपूरला जाण्यास आणि तेथे समेटाची प्रक्रिया सुरू करण्यास सतत नकार देत आहेत," असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसBJPभाजपा