शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

काँग्रेसमध्ये घमासान सुरूच! कपिल सिब्बल यांच्या नव्या ट्विटमुळे पुन्हा वादाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 14:36 IST

कपिल सिब्बल यांनी याआधी 'माझ्यासाठी पद नाही तर देश महत्त्वाचा' असे ट्विट केले होते.

ठळक मुद्देकाँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांची पुन्हा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.

नवी दिल्ली - काँग्रेसमध्ये अद्यापही घमासान सुरु असल्याचे दिसून येते. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचे नवीन ट्विट पुन्हा एकदा वाद निर्माण करू शकते. ज्यावेळी तत्त्वांसाठी लढा चालू असतो, त्यावेळी विरोध नेहमी ऐच्छिक असतो आणि समर्थन नेहमी व्यवस्थापित करण्यात येते, असे कपिल सिब्बल यांनी बुधवारी म्हटले आहे.

कपिल सिब्बल यांनी पुन्हा ट्विट केले आहे. "ज्यावेळी तत्त्वांसाठी लढा दिला जात आहे, तर आयुष्यात, राजकारणात, न्यायामध्ये, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये, सोशल मीडिया मंचांवर ऐच्छिक असतात. मात्र, समर्थन बरेचदा व्यवस्थापित केले केले जाते," असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मंगळवारी सुद्धा कपिल सिब्बल यांनी ट्विट केले होते. त्यावेळी 'माझ्यासाठी पद नाही तर देश महत्त्वाचा' असे ट्विट केले होते. त्यामुळे कपिल सिब्बल काँग्रेसशी बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले होते.

यापूर्वी कपिल सिब्बल यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून संघटनेत सर्वसमावेशक बदल करण्याची आणि पूर्णवेळ अध्यक्षांची मागणी केली होती. तसेच, पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह २० हून अधिक सदस्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष निवडीबाबत पत्र लिहिले होते. त्यामुळे पक्षात वाद निर्माण झाला होता. मात्र, काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांची पुन्हा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.

संजय झा यांचा काँग्रेसवर निशाणा काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या संजय झा यांनीदेखील भाष्य केलं आहे. ही अंताची सुरुवात आहे, अशा शब्दांत झा यांनी काँग्रेसमधील घडामोडींवर निशाणा साधला आहे. झा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये काँग्रेसचा कुठेही उल्लेख नाही. मात्र त्यांचं ट्विट काँग्रेसमधील कुरबुरींवर असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या १०० हून अधिक नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिल्याचं संजय झा यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. मात्र त्यांचा दावा काँग्रेसनं खोडून काढला होता.

सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय? देशभरातील काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी २३ नेत्यांनी पत्रातून केली. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असं २३ नेत्यांनी पत्रात म्हटलं होतं.

आणखी बातम्या...पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र     धक्कादायक! Rail Yatri वेबसाइटवरून ७ लाख प्रवाशांचा डेटा लीक, डेबिट कार्ड-UPI चे होते डिटेल्स    आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार    CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...    

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेस