शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींना प्रत्युत्तर देताना कन्हैय्या कुमारची जीभ घसरली; INDIA च्या टीकेवरून संतापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 14:09 IST

NDA Vs INDIA: स्वतःच्या पत्नीची जबाबदारी घेतली नाही, ते देशाची जबाबदारी उचलतील का? असा प्रश्न कन्हैय्या कुमारने केला आहे.

NDA Vs INDIA: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी NDA आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. भाजपविरोधी पक्षांनी आपल्या नव्या आघाडीला INDIA असे नाव दिले आहे. विरोधकांना चितपट करत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी NDA नेही कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी INDIA वर जोरदार टीका केली होती. यावरून काँग्रेसने सत्ताधारी मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. यावरून आता कन्हैय्या कुमारने टीका केली आहे. मात्र, टीका करताना कन्हैय्या कुमारची जीभ घसरली आणि पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केले. 

भाजपविरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ नावाच्या महाआघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्लाबोल केला. ब्रिटिशांची राजवट लादणारी ‘इस्ट इंडिया कंपनी’, दहशतवादी संघटना ‘इंडियन मुजाहिद्दीन’, बंदी घातलेली ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, अगदी ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ या नावांमध्ये ‘इंडिया’ शब्द वापरला आहे. केवळ नाव घेऊन यश मिळत नसते. विरोधक विखुरलेले आहेत. हताश आहेत. त्यांना आणखी बराच काळ सत्तेत येण्याची इच्छा नाही, असे त्यांचा दृष्टीकोन पाहता दिसते, अशा शब्दांत पंतप्रधानांनी निशाणा साधला. यावर कन्हैय्या कुमारने टीका करताना आक्षेपार्ह विधान केले.

नेमके काय म्हणाला कन्हैय्या कुमार?

बंगळुरुमध्ये आयोजित युवक काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना कन्हैय्या कुमार म्हणाला की, देशाचा कारभार ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहिणाऱ्या पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या हातात नाही. आज देशाचा कारभार परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या आणि भारतीय संविधान लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात नाही. आज देशाचा कारभार २३ व्या वर्षी हसतहसत फासावर जाणाऱ्या शहीद भगतसिंग यांच्या हातात नाही. देशाचा कारभार अशा व्यक्तीच्या हातात आहे ज्यांनी स्वतःच्या पत्नीची जबाबदारी उचलली नाही. ज्यांनी स्वतःच्या पत्नीची जबाबदारी उचलली नाही, ते देशाची जबाबदारी उचलतील का? असा प्रश्न कन्हैय्या कुमारने केला आहे. 

मला भाजप, मोदी व RSSवर बोलण्याची इच्छा नाही, पण...

आज देशाचा कारभार अशा व्यक्तीच्या हातात आहे जो व्यक्ती म्हणतो की, पीआयएफच्या नावातही इंडिया आहे, म्हणजे कुत्र्यालाही चार पाय असतात. गाढवालाही चार पाय असतात. त्यामुळे सर्व गाढवं कुत्री आहेत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जो तर्क लावतात तो तर्क मी लावला, तर असे म्हणू शकतो की मोदींनाही दोन डोळे आहेत आणि गाढवालाही दोन डोळे आहेत. भाजप, मोदी व आरएसएसवर बोलण्याची इच्छा नाही. केवळ आपण किती गंभीर परिस्थितीत उभे आहोत हे सांगायचे आहे, या शब्दांत कन्हैय्या कुमार यांनी पलटवार केला. 

 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारcongressकाँग्रेस