शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"माझं ऐकलं नाही, तर पुढचे 50 वर्ष काँग्रेस सत्तेवर येणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 20:24 IST

निवडणूक व्हायला हवी. कारण, असेही होऊ शकते, की नियुक्त करण्यात आलेल्या काँग्रेस अध्‍यक्षाला एक टक्काही सपोर्ट नाही. जर निवडून आलेल्या घटकांनी पक्षाचे नेतृत्व केले, तर पक्षाची स्थिती सुधारेल.

ठळक मुद्देआझाद म्हणाले, असेही होऊ शकते, की नियुक्त करण्यात आलेल्या काँग्रेस अध्‍यक्षाला एक टक्काही सपोर्ट नाही.आझाद म्हणाले, पूर्वपदावर यायचे असेल तर निवडणूक होणे आवश्यक.निवडणूक झाली, तर अनेक नेते गायब होतील - आझाद

नवी दिल्‍ली -काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. काँग्रेस कार्यसमितीसह संघठनेतील मुख्य पदांसाठी निवडणूक व्हायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर जे लोक निवडणुकीला विरोध करत आहेत, त्यांना आपले पद जाण्याची भीती वाटते. निवडणूक व्हायला हवी. कारण, असेही होऊ शकते, की नियुक्त करण्यात आलेल्या काँग्रेस अध्‍यक्षाला एक टक्काही सपोर्ट नाही. जर निवडून आलेल्या घटकांनी पक्षाचे नेतृत्व केले, तर पक्षाची स्थिती सुधारेल. 'अन्यथा काँग्रेस पुढील 50 वर्ष विरोधातच बसत राहील,' असेही आझाद म्हणाले.

'पूर्वपदावर यायचे असेल तर निवडणूक होणे आवश्यक' -गुलाम नबी आझाद म्हणाले, "गेल्या अनेक दशकांपासून, पक्षात निवडून आलेले घटक नाहीत, कदाचित आपल्याला 10-15 वर्षांपूर्वीच असे करायला हवे होते. आता आपण एका पाठोपाठ एक निवडणुका हरत आहोत. जर आपल्याला पुन्हा पूर्वपदावर यायचे असेल तर निवडणुका घेऊन पक्षाला बळकटी द्यावी लागेल. जर माझ्या पक्षाची पुढील 50 वर्षांपर्यंत विरोधात बसण्याची इच्छा असेल तर पक्षांतर्गत निवडणुका घेण्याची काहीही आवश्यकता नाही."

'मला पक्षाध्यक्ष व्हायचं नाही' - आझाद म्हणाले, "मी एकदा मुख्यमंत्री राहिलो आहे, केंद्रीय मंत्री राहिलो आहे, पक्षात सीडब्‍ल्‍यूसी सदस्‍य आणि महासचिवही होतो. मला माझ्यासाठी कसलीही अपेक्षा नाही. मी पुढचे 5 ते 7 वर्ष सक्रिय राजकारणात राहील. माझी पक्षाध्यक्ष होण्याची इच्छा नाही. एका खऱ्या काँग्रेसी प्रमाणे, पक्षाच्या हितासाठी निवडणूक व्हावी, अशी माझी इच्छा आहे."

'पक्षाचा पुढील अध्यक्ष निवडणूक जिंकून व्हावा' -एएनआय या वृत्त संस्थेशी बोलताना आझाद म्हणाले, "जेव्हा तुम्ही निवडणूक लढता, तेव्हा किमान 51 टक्के तुमच्या बाजूने असतात. इतर उमेदवारांना 10 किंवा 15 टक्केच मते मिळतात. जो जिंकेल आणि पक्षाध्यक्ष होईल त्याच्यासोबत 51 टक्के लोक असतील. मात्र, यावेळी जो कुणी पक्षाध्यक्ष होईल त्याच्या बाजूने एक टक्काही समर्थन नसेल. जर CWC चे सदस्य निवडून आले, तर त्यांना बाजूला केले जाऊ शकत नाही. यात समस्या कुठे?"

निवडणूक झाली, तर अनेक नेते गायब होतील -यावेळी निवडणुकीला विरोध करणाऱ्या नेत्यांनाही आझादांनी फैलावर घेतले. आझाद म्हणाले, जे प्रामाणिक असल्याचा दावा करत आहेत, खरे तर ते खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत. तसेच ते पक्ष आणि देश हितासाठी धोकादायक आहेत. तसेच, "जे पदाधिकारी अथवा राज्‍यातील संस्थांचे घटक आमच्या प्रस्तावाला विरोध करत आहेत, त्यांना माहीत आहे, की निवडणूक झाली तर ते पदावर राहणार नाही. काँग्रेससोबत जो एकनिष्ठ आहे, तो पत्राचे स्वागत करील. मी म्हटले आहे, की राज्‍य, जिल्हा आणि ब्‍लॉक पातळीवर अध्‍यक्षांची निवड पक्ष कार्यकर्त्यांनी करायला हवी."

महत्त्वाच्या बातम्या -

खूशखबर! : स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! पुन्हा सुरू होतेय मोदी सरकारची 'ही' खास योजना

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण

खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

टॅग्स :congressकाँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीIndiaभारतSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी