शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची जीभ घसरली; पंतप्रधानांना म्हणाले 'पागल मोदी', राजकारण पेटणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 13:58 IST

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी अनेकदा वादक्रस्त विधान करत आले आहेत.

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने 2000 ची नोट चलनातून बाद केली आहे. या निर्णयावरुन काँग्रेस केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनीही यावर टीका करताना पीएम मोदींवर वादग्रस्त टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या ठीक नाही आणि अशा परिस्थितीत 2000 च्या नोटा बंद करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. हा मोदी नसून पागल मोदी आहे, अशी टीका त्यांनी केली.

अधीर रंजन चौधरी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आहेत आणि त्यांनी संसदेत अनेकवेळा सरकारवर टीका करताना तुम्ही ऐकले असेल. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अधीर रंजन अनेकदा चर्चेत आले आहेत. आता त्यांच्या ताज्या वक्तव्यावरुन राजकारण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय चुकीचा आहे. हा निर्णय घ्यायला नको होता. 

अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या बैठका आणि तिसर्‍या आघाडीच्या शक्यतांबाबत म्हटले की, काँग्रेसशिवाय विरोधी पक्ष असू शकत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबतची बैठक पाटण्यातही निश्चित करण्यात आली होती. मात्र आता ती बैठक दिल्लीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीने काहीही होणार नाही. त्यांनीही आमच्यासोबत यावे यासाठी आम्ही प्रयत्न करू. 2024 मध्ये काही बदल होऊ शकतात, यासंदर्भात विरोधी पक्षांमध्येही चर्चेला सुरुवात झाली आहे.

28 मे रोजी संसद भवनाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. विरोधी पक्षांनी ताकद दाखवण्यासाठी ही तारीख योग्य मानली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि विरोधी पक्ष नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती आहे. या दिवशी विरोधी पक्षांचे नेते एकत्र येऊन भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन करतील. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेक विरोधी नेत्यांशी चर्चा केली आहे. अलीकडेच त्यांनी दिल्लीत येऊन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.    

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी