शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची जीभ घसरली; पंतप्रधानांना म्हणाले 'पागल मोदी', राजकारण पेटणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 13:58 IST

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी अनेकदा वादक्रस्त विधान करत आले आहेत.

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने 2000 ची नोट चलनातून बाद केली आहे. या निर्णयावरुन काँग्रेस केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनीही यावर टीका करताना पीएम मोदींवर वादग्रस्त टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या ठीक नाही आणि अशा परिस्थितीत 2000 च्या नोटा बंद करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. हा मोदी नसून पागल मोदी आहे, अशी टीका त्यांनी केली.

अधीर रंजन चौधरी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आहेत आणि त्यांनी संसदेत अनेकवेळा सरकारवर टीका करताना तुम्ही ऐकले असेल. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अधीर रंजन अनेकदा चर्चेत आले आहेत. आता त्यांच्या ताज्या वक्तव्यावरुन राजकारण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय चुकीचा आहे. हा निर्णय घ्यायला नको होता. 

अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या बैठका आणि तिसर्‍या आघाडीच्या शक्यतांबाबत म्हटले की, काँग्रेसशिवाय विरोधी पक्ष असू शकत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबतची बैठक पाटण्यातही निश्चित करण्यात आली होती. मात्र आता ती बैठक दिल्लीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीने काहीही होणार नाही. त्यांनीही आमच्यासोबत यावे यासाठी आम्ही प्रयत्न करू. 2024 मध्ये काही बदल होऊ शकतात, यासंदर्भात विरोधी पक्षांमध्येही चर्चेला सुरुवात झाली आहे.

28 मे रोजी संसद भवनाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. विरोधी पक्षांनी ताकद दाखवण्यासाठी ही तारीख योग्य मानली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि विरोधी पक्ष नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती आहे. या दिवशी विरोधी पक्षांचे नेते एकत्र येऊन भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन करतील. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेक विरोधी नेत्यांशी चर्चा केली आहे. अलीकडेच त्यांनी दिल्लीत येऊन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.    

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी