शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची जीभ घसरली; पंतप्रधानांना म्हणाले 'पागल मोदी', राजकारण पेटणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 13:58 IST

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी अनेकदा वादक्रस्त विधान करत आले आहेत.

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने 2000 ची नोट चलनातून बाद केली आहे. या निर्णयावरुन काँग्रेस केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनीही यावर टीका करताना पीएम मोदींवर वादग्रस्त टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या ठीक नाही आणि अशा परिस्थितीत 2000 च्या नोटा बंद करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. हा मोदी नसून पागल मोदी आहे, अशी टीका त्यांनी केली.

अधीर रंजन चौधरी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आहेत आणि त्यांनी संसदेत अनेकवेळा सरकारवर टीका करताना तुम्ही ऐकले असेल. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अधीर रंजन अनेकदा चर्चेत आले आहेत. आता त्यांच्या ताज्या वक्तव्यावरुन राजकारण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय चुकीचा आहे. हा निर्णय घ्यायला नको होता. 

अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या बैठका आणि तिसर्‍या आघाडीच्या शक्यतांबाबत म्हटले की, काँग्रेसशिवाय विरोधी पक्ष असू शकत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबतची बैठक पाटण्यातही निश्चित करण्यात आली होती. मात्र आता ती बैठक दिल्लीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीने काहीही होणार नाही. त्यांनीही आमच्यासोबत यावे यासाठी आम्ही प्रयत्न करू. 2024 मध्ये काही बदल होऊ शकतात, यासंदर्भात विरोधी पक्षांमध्येही चर्चेला सुरुवात झाली आहे.

28 मे रोजी संसद भवनाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. विरोधी पक्षांनी ताकद दाखवण्यासाठी ही तारीख योग्य मानली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि विरोधी पक्ष नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती आहे. या दिवशी विरोधी पक्षांचे नेते एकत्र येऊन भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन करतील. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेक विरोधी नेत्यांशी चर्चा केली आहे. अलीकडेच त्यांनी दिल्लीत येऊन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.    

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी